नमस्कार मित्रांनो.
स्वयंपाक घर एक मंदिर आहे. म्हणून आपण मंदिर जसे स्वच्छ व शुद्ध ठेवतो. त्याप्रमाणे आपले स्वयंपाक घर शुद्ध व स्वच्छ ठेवावे. कारण स्वयंपाक घरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते. जर आपण स्वयंपाक घर स्वच्छ ठेवले.
त्याचे पावित्र्य राखले. तरच देवी अन्नपूर्णा तेथे थांबते. नाहीतर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते. ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या वास असतो. अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही.
अशा घरात नेहमी बरकत राहते. आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली. की आपल्या घरात बरकत राहत नाही. आपल्याला अन्न व पाण्यासाठी तरसावे लागते. म्हणून देवी अंनपूर्नचा नेहमी आदर करा.
आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपले स्वयंपाक घर स्वच्छ, शुध्द, पवित्र ठेऊ. काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते. मग त्या स्नान न करता तसाच स्वयंपाक घरात जातात. आणि चहा बनवतात. स्वतःही तसाच चहा घेतात.
आणि घरातील इतर सदस्यांनाही देतात. परंतु यामुळे घरात अशूद्धी पसरते. सकाळी पतीला मुलांना टिफिन द्यायचे असतात. घाई असते. असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी स्नान न करता स्वयंपाकाला सुरुवात करतात. स्वयंपाक झाला सर्वांचे टिफीन दिले. की आरामात आंघोळ करतात.
परंतु यामुळे तुम्ही जे अन्न बनवले आहे त्यात अशुद्धी मिसळली जाते. त्याचे पावित्र्य राहत नाही. आणि तेच अन्न खाऊन आपले मनही अशुद्ध होते. आणि यामुळे घरात दारिद्र्य व आजारपण यायला सुरुवात होते.
म्हणून घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी स्नान करावे. स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावे. किचन ओटा पूसून घ्यावा. गॅसची शेगडी स्वच्छ करावी. देवी अन्नपूर्णाला नमस्कार करून त्यानंतर गॅस चालू करावा.
आता तुम्ही म्हणाल आम्ही रात्रि कीचन साफ केले होते. मग सकाळी कशासाठी स्वच्छ करायचे. परंतु रात्री अकरा ते तीन पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते. ती नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरातही असते.
जे आपल्या किचनच्या ओट्यावर गॅसच्या शेगडीवर ही पसरलेली असते. ती नकारात्मक काढून टाकण्यासाठी सर्वांतआधी किचनची सफाई करावी. आणि त्यानंतरच सुरुवात करावी. तसेच अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. असे आपण म्हणतो. तो भगवंतांचा प्रसाद म्हणून ग्रहण करतो.
तर हा प्रसाद पवित्र शरीराने तसेच शुद्ध वातावरणात केला तरच त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात. आपल्या स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवावे. काही स्त्रियांना रात्रीचे उष्टे खरकटे भांडे तसेच जमा करून ठेवण्याची सवय असते.
त्या सकाळी उठल्याकी मग ते भांडे स्वच्छ करतात. परंतु हे खुप चुकीचे आहे. उष्टे खरकटे भांडे कधीही कीचनवर तसेच पडू देऊ नये. कारण यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. उष्ट्या खरकत्या भांड्यांवर खूप जीव जंतू निर्माण होतात.
ते आपल्या कीचनचे वातावरण दूषित करतात. पर्यायाने आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडे स्वच्छ करून त्यांची व्यवस्थित स्वच्छता करावी.
जर आपल्याकडे कामवाली मावशी येणार असेल तरीही ती कीचनवर भांडी तशीच जमा करून ठेवू नये. सर्व भांडी पाण्याने विसलून त्यातील खरकटे बाजूला काढून टाकून द्यावे. आणि ते भांडे बाहेर किंवा गॅलरी ठेवावी.
किचन मधे भांडी पडू देऊ नये. स्वयंपाक झाला की सर्वात आधी भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा. आणि त्यानंतरच आपण जेवण करावे. आणि तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्नान करून स्वयंपाक करतो.
कारण स्नान करून स्वयंपाक केला तरच आपण भगवंताला नैवद्य अर्पण करू शकतो. आणि भगवंताला नैवद्य अर्पण केला तर आपल्या घरातील अन्न हे अन्न न राहता भगवंतांचा प्रसाद बनतो. आणि आपण प्रसाद खाल्ल्याप्रमाणे होते. घरातील सर्वांना अशी सवय लावावी. की स्नान केल्याशिवाय किचन मध्ये प्रवेश करू नये.
म्हणजे आपल्या स्वयंपाक घराचे पावित्र्य राखले जाईल. आणि देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होऊन देवीचे वास्तव्य कायम आपल्या घरात राहून घरात बरकत राहील. कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही.
तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद