Skip to content

अंत्यसंस्काराच्या वेळी” राम नाम सत्य है “जप का केला जातो. जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्या हिंदू धर्मात राम नाम सत्य है ह्या जपला खूप महत्त्व सांगितलेले आहे. या नामाचा तीनदा जप केल्याने एक हजार वेळा देवाचे नाम जपल्यासारखेच प्रभाव पडतो असे म्हणतात. परंपरेनुसार अंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य है असा जप केला जातो. तर कोणत्याही आनंदाच्या वेळी हे चार शब्द उच्चारले जात नाहीत. मग हे शब्द कोणाच्यातरी मृत्यूनंतरच का विचारले जातात? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. चला तर मग जाणून घेऊयात.

माणूस जिथे जन्माला येतो त्याला त्या तिकडचे नियम पाळावे लागतात. वय पूर्ण झाल्यानंतर भगवंताचे नाव म्हणजेच राम नाम माणसाच्या शेवटच्या प्रवासातही सोबत असतो. असे मानले जाते की पांडवाचे ज्येष्ठ बंधू धर्मराज युधिष्ठिर यांनी महाभारता काळात प्रथमच एका श्लोकाचा उच्चार केला होता. राम नामाचा जप केल्याने नेमके काय होते हे सुद्धा जाणून घेऊयात.

अंत्यसंस्कारासाठी नेत असताना जेव्हा रामाचे नाम घेतले जाते तेव्हा, हा शब्द मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना व जवळच्या व्यक्तींना हे कळवायचे असते की मरण आल्यानंतर मनुष्य आपल्यासोबत काहीही घेऊन जात नाही. माणूस एकटा जन्माला येतो आणि मृत्यू झाल्यानंतर एकटाच जातो. शरीर नश्वर आहे आणि आत्मा या जीवन चक्रा तून मुक्त होतो.

संसारिक आसक्ती पासून मुक्त होतो. म्हणून आता या मृत शरीराला काहीही अर्थ नाही. आणि रामाचे नाम हे एकच सत्य आहे आणि राम नामाचा जप केल्याने व्यक्ती या जगाचा निरोप घेतल्याची जाणीव होते. जेव्हा एखाद्या व्यक्ती मरण पावतो तेव्हा त्याच्या प्रियजनांना खूप दुःख होते . ते या मृत्यूचे दुःख सहन करू शकत नाहीत त्यावेळी अशाप्रकारे नामाचे

स्मरण केल्याने त्यांना ते दुःख सहन करण्याची शक्ती मिळते. त्यांच्या वेदना कमी होऊन मानसिक शांती मिळते .मनुष्य जे कर्म करतो ते भोगावेच लागते. म्हणजेच त्याचा पुढचा जन्म त्या आधारावर ठरवला जातो. परंतु जगरूपी माया कोणीच समजू शकत नाही. ज्याला समजते त्याला ज्ञानी म्हणतात. म्हणूनच जेव्हा मृतदेह नेतात तेव्हा राम नाम सत्य है हा जप मृत व्यक्तीसाठी केला जात नाही.

तर त्याच्या जवळच्या आणि प्रियजनांसाठी केला जातो. जेणेकरून त्यांना समजेल की मृत्यू अटळ आहे आणि राम हेच सत्य आहे . कोणाचा मृत्यू झाला की रामाचे नाम घेतले जाते. म्हणजे आत्म्याला मुक्ती मिळाली आहे. आत्मा संसार चक्रातून मुक्त झाला आहे.

आत्मा सर्व काही सोडून देवाकडे गेला याचा असाही अर्थ होतो. हे अंतिम सत्य आहे हिंदू धर्म ग्रंथ नुसार रामनाम सत्य है हे बीज अक्षर आहे. राम नामाचा जप केल्याने वाईट कर्मापासून मुक्ती मिळते. काही लोकांचा असाही विश्वास आहे की हा जप केल्याने, मृतांच्या नातेवाईकांना शांती मिळते. यादरम्यान रामाचे नाव खरे आहे.

कोण हे जग व्यर्थ आहे हे ऐकून ही जाणीव होते .मृतदेह घेताना एक व्यक्ती अशी आहे की जी आयुष्य पूर्ण करून सर्वांना निरोप देते. दुसरीकडे इतर लोक आहेत जीवन जगत आहेत अशा स्थितीत राम नाम सत्य है ही ओळ सांगते की जीवनात जे काही प्राप्त होते, इथेच उरते. शेवटी जे उरते ते फक्त रामाचे नाव.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *