नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो अनुभव का येत नाही. इच्छा पूर्ण का होत नाहीत. तुमच्याकडूनही एक चूक तर होत नाही ना. मित्रांनो आपण स्वामींची सेवा करतो. स्वामींची भक्ती करतो. पारायण करतो मंत्रजप करतो. परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या सेवेचे फळ मिळत नाही. लाभ होत नाहीत. अनुभव सुद्धा येत नाहीत.
इच्छा सुद्धा पूर्ण होत नाहीत. मग बऱ्याच वेळेस आपण विचार करतो की माझ्यासोबत असं का होतं. मलाच अनुभव का येत नाहीत. माझ्याच इच्छा पूर्ण का होत नाहीत. आपल्याला कळतं की समोरच्याला किंवा दुसर्याला अनुभव आले. त्याची इच्छा पूर्ण झाल्यात.
आपण अनुभवतो कोणाची तरी इच्छा पूर्ण झाली आहे. आपण अनुभवतो अनुभव वाचतो. तेव्हा त्याला वाटते की यांना कसा अनुभव येतात. आम्हाला आपल्याला का अनुभव येत नाहीत आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत.
तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याकडून काही चुका होत तर नाही ना. हे पण आपण बघणे गरजेचे आहे. अशीच एक चूक ती तुमच्याकडून होत असेल तुम्ही त्याकडे लक्ष द्या. आपण सेवा तर करतो.
श्रद्धेने करतो विश्वास ठेवून करतो. दिवस-रात्र करतो. नियमांनी करतो सर्व नियमांचे पालन करून करतो. तरी मग असं का होतं. तर मित्रांनो आपल्या कडून ही एक चूक होत असेल. ती म्हणजे आपण आधीपासून ठरवून बसतो की मलाहे हव आहे.
माझ्या इच्छा आहेत. आणि या इच्छेसाठी मी ही सेवा करेन. मी मंत्र जप करेल. या इच्छेसाठी या गोष्टीसाठी श्री गुरुचरित्र पारायण हे आपण आधीच ठरवतो. की मला हे हव आहे. आणि त्यासाठी मी हे करतो. किंवा आपल्याला कोणीतरी सांगितले की हा अनुभव येतात.
मग ते आपण आधीच ठरवतो. कि आधी मी सेवा करतो. मग मलाही अनुभव येतील. मग एक महिना करतो. दोन महिन्या करतो विचार करतो. अरे अनुभव का येत नाहीये. अरे मी तर संकल्प सोडला. मग माझी इच्छा पूर्ण का होत नाहीये.
मी गुरुचरित्र पारायण केले पण तरी मी जे सांगितले मी जे बोललो मी जे मागितलं ते मला का नाही मिळालं. हे आपण आधीच ठरवतो. सेवा करण्याच्या आधी किंवा सुरू होण्याच्या आधी किंवा मग सेवा सुरू सुद्धा केली तरी ते मनात राहतच. की आपल्याला अनुभव येत नाहीये. इच्छा पूर्ण होत नाहीये.
मग बंद करू का सेवा. मग याचा लाभ कधी होईल. हे सगळ्या गोष्टी असतात. तर आपण आधीच ठरवतो. मनात आपल्या एक लालसा असते. ती जर आपण बाजूला ठेवली तर मग सगळं काही सुरळीत होईल. आणि हीच आपली चूक असते. की आपण आधीच सगळ काही मागून बसतो.
काहीतरी ठरवतो. अनुभव बद्दल इच्छेबद्दल आपण खाली मनाने काहीच करत नाही. म्हणून जे फक्त मनात काहीच न ठेवता. फक्त श्रद्धेने विश्वासाने ती सेवा करतात. काहीच न मागता त्यांना सर्व काही मिळत. कारण ते स्वामी आहेत. परब्रम्ह आहेत.
त्यांना काही सांगण्याची गोष्ट लागत नाही. ते सगळं काही जाणून असतात. आपण सांगू आणि मग तेव्हा त्यांना कळेल. असं तर नाहीना. आपलं दुःख आहे आपली अडचण आहे आपले संकट आहे आपल्या समस्या आहेत. ते त्यांना सांगून समजेल असं नाही.
तर त्यांना सगळं काही माहित आहेत. आणि सगळं काही ते पूर्ण करतात. सगळं काही आपल्याला देतात. फक्त त्यांना सांगण्याची गरज नाही. फक्त आपल्या कडून जेवढ होईल सेवा असुद्या. पारायण मंत्र जप होईल. तेवढा आपण करायचे.
त्याच्या पलीकडे नाही केल तरी ते काय नाराज होत नाही. म्हणून आपल्याकडून जेवढे होईल तेवढं करा. काही मागू नका काही सांगू नका. ते सगळं काही ओळखतात. म्हणून आपण सुद्धा ही एक चूक अजिबात करू नका. तुम्हालाही अनुभव येईल. सर्व इच्छा पूर्ण होतील.
तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद