Skip to content

घरात चुकीच्या जागी ठेवलेली पाण्याची टाकी, करते वास्तू नुकसान. बघा तुम्ही तर नाहीना केली ही चूक.

  • by

नमस्कार मित्रांनो.

वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. घराचे बांधकाम करताना वास्तुशास्त्राचा विचार नक्कीच केला जातो. कारण घरातील प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला असेल तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात. परंतु जर का या गोष्टी चुकीच्या दिशेला असतील.

 तर त्याचे वाईट परिणाम आपल्या जीवनावर पडतात. वास्तुशास्त्रात पाण्याची अग्नीची देवी-देवतांची अशी प्रत्येक बाबीची जागा निश्चित केलेली असते. आणि आपण जर पाण्याच्या ठिकाणी अग्नी अग्नीच्या ठिकाणी पाणी अशी चुकीची रचना जर आपल्या घराची केली तर आपल्याला याचे अशुभ फळं मिळतात. 

वास्तूमध्ये वास्तुपुरुष असतो. आणि वास्तुपुरुषाची डोके ईशान्य दिशेला तर पाहिजे नैऋत्य दिशेला असतात. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराची रचना करावी लागते. आपण घराचे बांधकाम करताना इतर सर्व गोष्टींकडे नीट लक्ष देतो. 

परंतु घरात पाण्याची योग्य दिशा कोणती पिण्याचे पाणी कोणत्या दिशेला असावे. सांडपाणी कोणत्या दिशेला सोडाव. पाण्याची साठवण पाण्याची टाकी कोणत्या दिशेला असावी. या गोष्टीकडे नीट लक्ष देत नाही. यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

बहुतेक वेळा पाण्याशी संबंधित वास्तू दोषामुळे आपल्या घरात दारिद्र्य येते. तसेच घरातील गृहिणी ही सतत कोणत्या ना कोणत्या आरोग्याच्या तक्रारींनी पीडित असते. नेहमी आजारी पडते. म्हणून घरातील वापराचे पाणी व पिण्याचे पाणी योग्य ठिकाणी असणे फार आवश्यक आहे. 

चला जाणून घेऊ या पाण्याची दिशा कोणती ते. वास्तुशास्त्रानुसार विहीर कूपनलिका किंवा जलतरण तलाव असेल तर ते नेहमी घराच्या ईशान्य दिशेला असावे. ईशान्य दिशा ही पाण्याची दिशा आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य भागात विहीर बनवणे अत्यंत शुभ मानले जाते. 

ईशान्य दिशेला विहीर असल्यास आपल्याला सर्व प्रकारच्या वैभव व ऐश्वर्याची प्राप्ती होते. वास्तुशास्त्रानुसार जर पूर्व दिशेला विहीर किंवा बोरिंग करायचे असेल तर उत्तर दिशेला ही थोडीशी जमीन खाणावी. त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते.

वास्तुशास्त्रानुसार जर आपल्याला भूमिगत म्हणजे जमिनीच्या खाली अशी पाण्याची टाके बनवायचे असेल. तर ते घराच्या वायव्य नैऋत्य दक्षिण दिशांना अजिबात बनवू नये. वास्तुशास्त्रानुसार भूमिगत पाण्याची टाकी साठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे ईशान्य दिशा हवी. 

त्याशिवाय उत्तर पश्चिम तसेच पूर्व दिशेला ही आपण बनवू शकतो. जर आपल्याला छतावर पाण्याची टाकी ठेवायची असेल तर ती पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मधोमध किंवा वायव्य आणि पश्चिम दिशेच्या मधोमध ठेवावी. 

वास्तुशास्त्रानुसार छतावरील पाण्याची टाकी ईशान्य आग्नेय नैऋत्य कोणात अजिबात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील सर्व सांडपाणी शक्यतो ईशान्य दिशेने बाहेर पडेल अशी वास्तूची रचना असावी. घरातील पिण्याचे पाणी हे पूर्व दिशेला असावे. पिण्याच्या पाण्याचे भांडे स्वयंपाक घराच्या उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवावे. 

घरातील पिण्याचे पाणी जर योग्य दिशेला ठेवले असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. आणि घरात सुख-समृद्धी नांदते. घरातील कोणत्याही नळातून पाणी टपकत असेल तर ते लगेच दुरुस्त करावे. 

कारण पाणी म्हणजे संपत्ती आहे. आणि जर अशाप्रकारे आपल्या घरात पाणी वाया जात असेल तर आपली धन संपत्तीही अशा प्रकारे थोडी-थोडी वाया जात राहते. आणि हळूहळू आपल्याला दारिद्र्य येते. 

मित्रांनो पाने विषयीची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडले असेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *