नमस्कार मित्रांनो.
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच आमलकी एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी या नावाने ओळखले जाते.
हिंदू धर्मामध्ये या एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधि विधान पूर्वक पूजा-अर्चना केली जाते. मान्यता आहे की, या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व सुख प्राप्त होते.
मान्यता आहे की, या दिवशी व्रत उपवास करून एकादशीला एकादशीची कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्या सोबतच एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.
मान्यता आहे की, आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू बरोबरच आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने, मनुष्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्यचा नाश होतो. आणि सुख- समृद्धीची प्राप्ती होते.
धार्मिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला विशेष महत्व प्राप्त आहे. फाल्गुन शुक्लपक्ष पुष्प नक्षत्र दिनांक १४ मार्च रोज सोमवार आमलकी एकादशी असून यावेळी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत.
एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग बनत आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशीचे भाग्य चमकणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशींवर बरसणार असून जीवनातील नकारात्मक काळ आता संपणार आहे.
जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती बदलणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. आता परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे.
घर परिवारात चालू असणारी स्थिती आता बदणार असून आपल्या वाट्याला मंगल्याचे दिवस येणार आहे. मित्रांनो १४ मार्च सकाळी १०:२० मिनिटांनी एकादशीला सुरुवात होणार असून १५ मार्च रोजी १२: ०३ एकादशी समाप्त होणार आहे.
त्या राशी आहेत- मेष, मिथुन, कुंभ, मीन, सिंह, वृश्चिक.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद