नमस्कार मित्रांनो.
श्रोते हो ५ ऑक्टोंबर गुरुवारचा दिवस आणि या दिवशी आलेले आहे विजयादशमी. विजयादशमीला दसरा अशी ही म्हणतात. वर्षभराचे साडेतीन मुहूर्त आहेत. त्यापैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी श्रुती हो या विजयादशमीच्या रात्री म्हणजेच दसऱ्याच्या रात्री विशेष उपाय केले जातात. विजयादशमी चे काही तोटके आहेत उपाय आहेत ते अत्यंत प्रभावशाली असतात. आपट्याची जी पान असतात ती एकमेकांना सोने म्हणून दिली जातात.
कारण आपट्याच्या पानांचा स्वतःच एक वेगळे वैशिष्ट्य आहे. काही महत्त्व आहे. आपट्याच्या पानांमध्ये ईश्वरी तत्व आकर्षुण घेण्याची जी क्षमता आहे. ती फार मोठी आहे. आपट्याच्या पानात शिवतत्व तसेच रामतत्व सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि म्हणूनच ही आपट्याची पाने आपण आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवावीत. दसऱ्याच्या दिवशी व्हावीत.
तरी या आपट्याच्या पानांचा आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. मात्र हा उपाय जाणून घेण्यापूर्वी याची एक संपूर्ण विधी आधी समजून घ्या. केवळ एक ते दोन मिनिटांची विधी समजून घेण्यासाठी वेळ लागेल मात्र हा उपाय आपल्या संपूर्ण वर्षभर घरात गरिबी निर्माण होऊन देणार नाही. घरामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही. श्रोते हो जी ही आपट्याची पाने आहेत.
या आपट्याच्या पानांबाबत एक प्रचलित कथा आहे. की प्राचीन काळी वर्तनतू नावाचे एक ऋषी होऊन गेले. ही कथा का ऐकावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. जो हा पण उपाय आहे तो पूर्ण श्रद्धेने करतो. विश्वास ठेवून करतो. तेव्हा त्या उपायाचे तोटक्याचे फळ आपल्याला मिळते. म्हणून आता एक ते दोन मिनिटांमध्ये ही कथा मी तुम्हाला ऐकत आहे ही कथा ऐकताना कोणतीही शंका आपल्या मनात येऊ देऊ नका. तर प्राचीन काळी वर्तन तू नावाचे एक ऋषी होते.
त्यावेळी त्यांच्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी विद्या अर्जित करण्यासाठी येत होते. त्यापैकी एक जो विद्यार्थी होता तो होता कंस. त्या कोंसाचे जे शिक्षण होते ते ते १४ विद्यार्थ्यांनी गुरूकडून शिकून घेतले. आणि ज्यावेळी त्याला गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली त्यावेळेस त्याने वर्तनतुंना विचारले की मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ. असे म्हणून वर्तन तूना विचारले. गुरुदेव म्हणाले जर तुझा आग्रहच असेल तर तू मला एका विद्यासाठी एक कोटी सुवर्ण मुद्रा असे १४ विद्यांसाठी १४ कोटी सुवर्ण मुद्रा मला गुरुदक्षिणा म्हणून दे.
कंसाने खूप आग्रह केला होता. गुरुदक्षिणा घेण्यासाठी आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठीच वर्तन तू ऋषींनी अशाप्रकारे १४ कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. कंसाने खूप मोठा प्रयत्न केला. अनेक प्रयत्न केले पण त्याच्याने १४ कोटी मुद्रा जमवणं शक्य झाले नाही. तेव्हा तो आपल्या राजाकडे गेला आणि राजाचे जे नाव होते ते रघु राजा रघु राजाला त्याने सर्व हकीकत सांगितली. पण राजाने नुकतच एक यज्ञ पार पडल होतं.
त्यामुळे त्या राजाकडे तितक्या समुद्रा शिल्लक नव्हत्या. तेव्हा राजाने या कंसाकडे तीन दिवसाची मुदत मागितली. आणि थेट इंद्रदेवांवर स्वारी करण्याचे ठरवले. म्हणजेच स्वर्गलोकी जाऊन स्वर्गलोक ताब्यात घेण्याचा निश्चय केला. आणि इतर देवांना समजतात इंद्रदेव भयभीत झाले. पुढे इंद्राने कुबेरास विचारणा केली. तेव्हा कुबेर आणि या रघुराजाच्या राज्यात प्रचंड प्रमाणात सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला.
हा सुवर्ण मुद्रांचा पाऊस हा आपट्याच्या पानांच्या स्वरूपात होता. ती सुवर्णपाने खाली पडू लागली आणि कंसाने कोणताही मोहन बाळगता आपल्याला जेवढ्या आवश्यक होत्या तेवढ्या म्हणजेच १४ कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि त्या गुरुदक्षिणा म्हणून गुरुंना देऊन टाकल्या आणि उरलेल्या ज्या सुवर्ण मुद्रा आहेत त्यांच काय करायच हा जो विचार राजाला पडला होता त्यावेळी राजाने त्या गोरगरिबांना सुवर्ण मुद्रा लुटून नेण्यास सांगितले.
श्रोते हो तेव्हा जनतेने या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या. तो दिवस होता विजयादशमीचा म्हणजेच दसऱ्याचा. आणि मग तेव्हापासूनच दसऱ्याला आपट्याची पाने लुटण्याची प्रथा निर्माण झाली. आपट्याच्या पानांना सोन्याचे महत्त्व आले. तर श्रुती हो अशी ही सोन्याची पाने त्याचे महत्त्व आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहे. त्यामध्ये दैवी शक्ती असते ईश्वरी शक्ती असते. शिव तत्व असते श्री राम तत्व असते.
आणि ही शुभ पाने आपण दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना द्यायचे आहेत. आणि आपल्या देवघरामध्ये ही पाणे आपल्याला ठेवायचे आहेत. आणि रात्री झोपताना त्यातील एक किंवा दोन पान ती आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही लोक सोने नाणे ठेवता तिथे अवश्य ठेवा. आपल्या पर्समध्ये सुद्धा ही ठेवू शकता. अशी ही पाने वर्षभर जपून ठेवा. लक्षात ठेवा ही जी पाणे आज आपण मातेच्या चरणी वाहिलेली आहेत.
हे जेव्हा आपण आपल्या कॅशबॉक्समध्ये ठेवणार आहोत. तिजोरीत ठेवणार आहोत. त्यावेळेस आपल्याला आपल्या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. जेणेकरून आपण जर तोटका करत आहोत उपाय करत आहोत तो प्रभावशाली होईल. उपाय तर अनेक जण सांगतात मात्र योग्य उपाय योग्य प्रकारे उपाय अनेक लोक अर्धवट किंवा चुकीच्या प्रकारे सांगतात.
त्याचे फळ आपल्याला मिळत नाही श्रोतेहो विजयादशमीच्या रात्री असा हा छोटासा उपाय अवश्य करा. आणि आपल्या सर्वांच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या कृपेने आनंद सुख शांती नांदो हीच देवीच्या चरणी प्रार्थना.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.