Skip to content

वृश्चिक राशी १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर प्रगतीच्या काळाची सुरुवात धनलाभाचे योग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

वृश्चिक राशि १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर प्रगतीच्या काळाची सुरुवात धन लाभार्थी संकेत. मित्रांनो दिनांक १० सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आणि सकारात्मक ठेवण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

त्यामुळे आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो दिनांक १० सप्टेंबर रोजी नेपच्यून ग्रह वक्र गत्या कुंभ राशीमध्ये गोचर करणार आहेत. तर १७ सप्टेंबर रोजी सूर्य कन्याराशीमध्ये प्रवेश करणार आहेत. हे दोन्हीही राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहेत. 

भगवान सूर्य देवाच्या कृपेने विशेष करून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे‌ एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये होणार आहे. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल. मागील अनेक दिवसांपासून सतत करत असलेल्या आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. 

मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. या काळामध्ये आपल्याला वाद विवादापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच क्रोधावर नियंत्रण ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे. या काळामध्ये आपल्या वाणीचा आपल्याला चांगला उपयोग करावा लागेल. म्हणजे बोलण्याच्या कलेमध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणावी लागेल. 

मित्रांनो जेवढे होईल तेवढे गोड बोलणे या काळामध्ये आपल्यासाठी शुभ फलदायी ठरवू शकते. कोणी आपले मन अथवा भावना जरी दुखावल्या तरी त्यांना वाईट बोलू नका किंवा त्यांना कठोर शब्द वापरू नका. प्रत्येकाशी प्रेमाने आपुलकीने वागणे आपल्यासाठी या काळात हितकारी ठेवू शकते. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. 

व्यवसायाच्या दृष्टीने मागील काळात आपण घेतलेले निर्णय आता यशस्वी ठरणार आहेत. या काळामध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पैशांची आवक घरी वाढणार असली तरी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो या काळामध्ये पैशांची केलेली बचत पुढे चालून आपल्या उपयोगी पडू शकते.

 प्रेम जीवनामध्ये आपल्या जीवनसाथीची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत आणि मधुर बनणार आहे. या काळामध्ये शत्रूवर देखील विजय प्राप्त होणार आहे. शत्रू विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात. आपल्या महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा पूर्ण होण्याची संकेत आहेत. 

सूर्य देवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. त्यासोबतच नोकरीमध्ये अधिकारी वर्ग सुद्धा आपल्या कामावर प्रसन्न राहणार आहे. त्यामुळे नोकरीमध्ये बढती किंवा बदलीचे योग येऊ शकतात. अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. 

नवीन नोकरी आपल्याला मिळू शकते. मनाजोगी नोकरी मिळण्याचे संकेत आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील. मित्र आणि सहकाऱ्यांची मदत या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती सुद्धा आपल्याला होणार आहे. 

अध्यात्माकडे मनाचा कल वाढू शकतो. एखाद्या अध्यात्मिक गुरुचे प्रवचन आपल्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते. आता काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रत्येक शनिवारी शनि देवाला मोहरीचे तेल अर्पण करणे आपल्यासाठी अथवा शनीच्या नावाने छत्रीचे दान करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *