नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि विशेष म्हणजे अंगारकी चतुर्थीचा अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात.
एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला वरध विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. यावेळी चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी येत असते त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.
म्हणजे अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला वरध विनायक चतुर्थी तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो. मित्रांनो श्री गणेशाला प्रथम पूज्यनीय मानले जाते. कोणतेही शुभकार्य करण्या अगोदर श्री गजाननाची श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते. गणपती बाप्पाला संकट मोचन आणि विघ्नहर्ता असे म्हटले जाते.
असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य आणि संकटे येत असतील तर त्यावेळी गजाननाची उपासना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट दूर होतात. भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सोबतच सुख समृद्धीची बहार व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्तगण सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास करतात.
आणि चंद्रोदयानंतर भगवान श्री गणेशाची पूजा करून उपास सोडला जातो. श्री गणेशाच्या उपासनेसाठी चतुर्थीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. मान्यता या दिवशी गजाननाची विधी विधानपरिवार पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मान्यता आहे की चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये श्री गजाननाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते.
व्यक्तीच्या घरामध्ये सुख-समृद्धीची बाहेर येते. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नानानंतर श्री गणेशाची पूजा आरती करणे विशेष फलदायी मानले जाते. यावेळी भाद्रपद शुक्लपक्ष रेवती नक्षत्र दिनांक १३ सप्टेंबर रोज मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्री ८ वाजून ५१ मिनिटानंतर होणार आहे.
संकष्टी चतुर्थी दिवशी वृद्धी योग सिद्धि योग बनणार आहे. या योगाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जीवनावर दिसून येईल. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येण्यासाठी वेळ लागणार नाही.
जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारा दुखाचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे.गजाननाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. तर चला सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीवर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. यावेळी मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी होणार आहे. त्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. मित्रांनो आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुखाचा काळ ठरणार आहे. आता जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होईल.
मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत. या काळामध्ये आपल्याला करिअर आणि व्यापारामध्ये भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे. आपला अनेक दिवसा पासून पैसे आपल्याला प्राप्त होण्याची संकेत आहेत. या काळामध्ये अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. नोकरीच्या दृष्टीने आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
मानसिक ताणतणाव आणि जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होईल. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पहावयास मिळणार आहे. शेतीविषयक कामामध्ये आपल्याला पूर्ण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शेतीला जोडधंद्याची साथ दिल्यास चांगले उत्पन्न आपल्याला मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या योजना यावेळी फळाला येणार आहेत.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनामध्ये सुखाची बाहार येणार आहे. अनेक दिवसांचा आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अंगारिका संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ लाभकारी ठरणार आहे. शेतीमध्ये नव्या योजना आकणार आहात. आधुनिक शेती करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.
आधुनिक शेती केल्याने आपल्याला चांगले लाभ देखील प्राप्त होणार आहेत. मानसिक ताणतणाव दूर होईल. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. संततीकडून एखाद्यी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. संततीच्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.
करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये आपण राबवलेल्या योजना पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापार आणि कला क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश लागणार आहे. सुख समाधानाने आपले जीवन फुलून येणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.
कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. गजाननच्या आशीर्वादाने जीवनात येणारे संकटे बाधा आता दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून जीवनामध्ये चालू असणारा अपयश आणि अपमान जनक काळ आता समाप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे.
मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. चांगला नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण आता दूर होईल. अध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे मनाला एक नवी प्रेरणा प्राप्त होईल. जीवन जगण्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे. या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट पाहावयास मिळणार आहे. गजाननाची कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने नव्या योजना आखणार आहात.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन उपाय योजना राबवणार आहात आणि त्यामध्ये सफल देखील होणार आहात. ग्राहकांची आवक आपल्याकडे वाढणार आहे. करिअर मध्ये एखाद्या तज्ञ अथवा जवळच्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. उद्योग व्यापार समाधानकारक असेल.
विदेशामध्ये जाऊन व्यापार करण्याची आपली इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. प्रेम जीवनाविषयी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पारिवारिक जीवन सुख समाधान आणि ऐश्वर्याने फुलून येणार आहे.
तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा सखारात्मक प्रभाव दिसून येईल. चतुर्थीपासून पुढे एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. गजानन बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. त्यामुळे जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होईल. जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत.
सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. घर परिवारामध्ये सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. नवदांपत्याच्या जीवनामध्ये चिमुकल्या पाहण्याचे आगमन होऊ शकते. घरामध्ये एखादी धार्मिक अथवा मंगल कार्य घडून येण्याचे संकेत आहेत.
या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक आवक जरी चांगली होणार असली तरी या काळामध्ये पैशांची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. या काळामध्ये जेवढे गोड बोलाल तेवढे आपल्यासाठी चांगले असेल. वाणीचा चांगला उपयोग करून करिअरमध्ये चांगले यश प्राप्त करून घेण्यात सफल ठरणार आहात.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे. गणेशाच्या कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये सुखाच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आनंदाचे दिवस परत पुन्हा एकदा आपल्या वाट्याला येणार आहेत. मागील काळात घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा यावेळी भविष्याचा विचार करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. आपल्या वर्तमानाच्या दृष्टीने यावेळी प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे.
त्यामुळे या काळामध्ये सातत्याने केलेली कामे पुढे चालून मोठे यश आपल्याला देऊ शकतात. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मनाप्रमाणे घडामोडी घडून येतील. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
मीन राशि- मीन राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. संकष्टी चतुर्थीपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ग्रहनक्षत्राची अनुकूलता गजाननचा आशीर्वाद आणि नशिबाची साथ मिळवून जीवनामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.
उद्योग व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे मन समाधानी बनेल. जीवनामध्ये परिवाराची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे.
जीवनातील जोडीदारासोबत आपले संबंध सुधारतील. त्यामुळे मानसिक ताणतणाव काहीसा कमी होणार आहे. आपण घेतलेले निर्णय यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. करियर मध्ये मोठी यश आपल्या हाती लागू शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.