नमस्कार मित्रांनो.
आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी विवाहित स्त्रिया वट सावित्री व्रत वडाची पूजा करतात. वटसावित्री हे व्रत पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावं यासाठी केले जात. दर वर्षी ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत केलं जातं.
यंदाची वटपौर्णिमा १४ जून ला आली आहे. सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं सौभाग्य सुख सदैव राहो अखंड राहो. तुमच्या घर परिवारात सदैव सुख समाधान समृद्धी नांदो हीच सदिच्छा.
ज्या अविवाहित मुलींना सौभाग्यवती होण्याचा मान मिळत नसेल अर्थात त्यांचे विवाह जुळत नसतील तर त्यांच्यासाठी एक छोटासा उपाय आहे. हा उपाय वटपौर्णिमेला करायचा आहे. काय आहेत उपाय चला जाणून घेऊया.
ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांचे विवाह होण्यासाठी त्या हा उपाय करू शकतात. एक पाण्याचा नारळ, एक हिरवा ब्लाउज पीस, दोन मुठी तांदुळ, चार पिवळ्या खारीक, दोन हळकुंड, एक अत्तराची छोटीशी बॉटल, एक विड्याचे पान, दोन इलायची, दोन लवंगा, दोन बत्तासे हे साहित्य एकत्र करावं.
आता एखाद्या वडाच्या झाडाखाली जाऊन तिथे एक दिवा प्रज्वलित करावा. आणि धूप लावावा. त्यानंतर एका तांब्याच्या कलशामध्ये हळदी कुंकू थोडीशी साखर टाकावी दूर मिश्रित पाणी वडाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण कराव. आणि त्या मुळाशी जिथे तुम्ही पाणी वाहत आहात इतक्या मातीचा टिळा आपल्या कपाळी लावावा.
त्यानंतर वडाच्या मुळावर हळदी कुंकू अक्षदा वाहाव्या. एक हिरवा ब्लाउज पीस ठेवावा. त्यावर दोन मोठी तांदूळ नारळ-सुपारी एक रुपयाच नानं खारीक हलकट हे सगळ अर्पण कराव. विड्याच्या पानावर बत्तासे लवंग आणि इलायची सुद्धा ठेवावी. प्रसाद समर्पयामि असं म्हणत हातात थोडे पाणी घेऊन तेही अर्पण कराव.
त्यानंतर सर्व सामग्रीला पाणी फिरवावे. माता आदिशक्तीला नमन करावं. आणि हात जोडून वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा माराव्यात. या प्रदक्षणा करताना एक विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे.तो मंत्र या प्रमाणे आहे. ओम कोटी प्रणमम्यहम मामा अखंड सौभाग्य सुख देई देही मे नमः आणि कापूर जाळून विनंती करावी.
हे माते मला अखंड सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होवो. तू परम दयाळू आहेस तू परम पापनाशिनी आहेस. माझ्या विवाह मध्ये येणारे अडथळे अडचणी दूर कर. मला सौभाग्यप्राप्ती होऊ दे. पुढच्या वटपौर्णिमे पर्यंत मला सौभाग्यवती होण्याचा मान मिळू दे. अशा पद्धतीने मनापासून प्रार्थना करावी आणि नमस्कार करावा. हा प्रयोग त्या स्त्रिया सुद्धा करू शकतात.
ज्या पती-पत्नीमध्ये वाद विवाद होतात. किंवा वेगळे होण्याची वेळ आली आहे. तसेच हा उपाय वटपौर्णिमेला तर तुम्ही कराच पण याशिवाय समस्या खूप गंभीर असेल तर कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय केला तरीसुद्धा चालू शकतो.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.