नमस्कार मित्रांनो.
महिलांनी या गोष्टी केल्यास गरिबी टिकून राहते, कोणतीही कामे होत नाही स्त्री ही प्रत्येक घराची लक्ष्मी असते तिने केलेल प्रत्येक काम हे घरासाठी लाभदायक असते. आणि तिने जर काही चुकीचे काम केले तर त्याचे चुकीचे फळ सुद्धा त्याच घराला मिळतील.
जर महिला या चार चुकीच्या गोष्टी करत असतील तर त्यांनी त्वरित या गोष्टी थांबवाव्या नाहीतर याचे प्परिणाम तुमच्यावर व तुमच्या परिवारावर होतील. आता हे काम कोणती ती म्हणजे-
१) सकाळी खूप उशिरा पर्यंत झोपून राहणे ही सर्वात मोठी चूक आहे ही चूक कोणती महिला करत असेल तर लवकरात लवकर बदल करावे. लवकर उठावे अंघोळ करून देवपूजा करावी.
२) अंघोळ न करता किचन मध्ये प्रवेश करणे ही पण सगळ्यात मोठी चूक आहे. सकाळी तुम्हाला कितीही घाई असेल कोणाला डब्बा बनवून द्यायचा असेल चहा द्यायची असेल पण तुम्ही अंघोळ न करता किचन मध्ये प्रवेश करू नका. किचन हे अन्नपूर्णा मातेशी संबंधित असते म्हणून अंघोळ करूनच किचन मध्ये प्रवेश करावा.
३) संध्याकाळी झोपून राहणे किव्वा संध्याकाळी केस विंचरणे- भरपूर महिलांना सवय असते दिवसभरच्या कामापासून त्यांना संध्याकाळी च वेळ भेटतो म्हणून ते झोपून राहतात किव्वा केस विंचरतात. पण हे चुकूनही यापुढे करू नका.
४) देवाधर्माचे कोणतेही कार्य न करणे- महिलांनी दिवसातून एक वेळा तरी देवपूजा केली पाहिजे.सकाळी किव्वा संध्याकाळी कधीही चालते. आणि कोणतेही सणवार असुद्या देवाधर्माचे कार्य असूदया कोणत्याही महिलेने ते केलंच पाहिजे. तरच त्या घराला लाभ होतो . तर मित्रांनो महिलांनी या वरील चार गोष्टी चुकूनही करू नका.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद