नमस्कार मित्रांनो.
मित्रहो लवकरच आपला मोठा उत्सव येत आहे, त्याचे जोरदार स्वागत करण्यासाठी अनेकजण तयारी करत आहेत. याच दिवशी तांत्रिक उपाय केले जातात, अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग केले जातात त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे काहीशा गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
आपण आपल्याला बाधा होणाऱ्या या काही गोष्टींपासून दूर राहावे. सहसा ज्यांना नेहमीच नजरदोष सहज होतो अशा लोकांसाठी होळीची ही रात्र त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे काही लोक आपल्या वाईट परिस्थितीवर टपून असतात म्हणून त्यांच्यापासून जपून राहावे. आपल्या आयुष्यात नेहमी दुःख यावे अशी त्यांची इच्छा असते.
त्यामुळे होळीच्या दिवशी असे काही लोक आपल्यावर तांत्रिक प्रयोग करू शकतात. म्हणून आपण काळजी घेणे गरजेचे आहे, त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यातीलच एक म्हणजे सर्वप्रथम आपण अशा लोकांपासून दूर राहावे. तसेच असेच तांत्रिक प्रयोग हे अन्न पदार्थातूनच खास करून केले जातात.
या पदार्थांद्वारे ते आपल्याला देण्यात येतात. कोणी कितीही आग्रह केला तरी काही वस्तूंचे सेवन अजिबात करू नका. एखाद्या व्यक्तीच्या घरी जर तुम्ही भेटायला गेला आणि तिथे तुम्हाला काही खाण्यास दिले तर खाऊ नये.
त्या वस्तूला आधी नकार द्यावा, अन्यथा शक्य नसेल तर त्यावेळी ती वस्तू देणाऱ्या व्यक्तीला आधी ती वस्तू खायला सांगावी. जर ती वस्तू खाण्यास त्या व्यक्तीने नकार दिला तर समजून जावे की काहीतरी गडबड आहे.
जर या दिवशी कोणी तुम्हाला पांढऱ्या रंगाचा पदार्थ देत असेल उदाहरणार्थ दही, दूध, तांदूळ अशा पांढऱ्या पदार्थातून आपले आरोग्य सहज बिघडू शकते. तसेच दुसऱ्याच्या घरातील सुख शांती, धनसंपत्ती ओढून आणता येते. त्यांच्या घरातील समाधान आणता येते. म्हणून या दिवशी पांढऱ्या रंगाचे पदार्थ खाऊ नये.
तसेच विड्याचे पान कोणी तुम्हाला होळी दिवशी देत असेल तर ते देखील अजिबात सेवन करू नये. असे प्रयोग एखाद्या व्यक्तीला आपल्या ताब्यात करण्यासाठी केले जातात. एखाद्या व्यक्तीचा सुखाचा संसार सुरू असतो, पती पत्नीचे संबंध चांगले असतात.
अशावेळी एखादी स्त्री तुमच्या जवळ येऊन तुम्हाला विड्याचे पान खायला देऊन तुम्हाला वश करण्याचा प्रयत्न करू शकते. किंवा तुमच्या घरातील स्त्रीला देखील एखादा पुरुष येऊन हे विड्याचे पान देऊन वश करू शकतो. त्यामुळे तुमच्या नात्यात विरह येण्याची दाट शक्यता असते.
तसेच या तंत्र साधनात लवंग देखील जास्त वापरली जाते, त्यामुळे या दिवशी कोणी लवंग देत असेल तर ती देखील सेवन करू नये. किंवा काही लोक लवंग पाण्यात विरघळून देखील तुम्हाला देऊ शकतात. म्हणून पाणी पिताना देखील जपून प्यावे.
तसेच डोक्यावरील केसांचे सुद्धा रक्षण करावे, हे केस सांभाळावे. केस विंचरल्या नंतर कुठेही टाकू नका, ते कोणाच्याही ताब्यात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण केसांना वापरून मोठमोठी तांत्रिक विद्या करता येते. त्याचा खूप वाईट परिणाम होतो.
तर मित्रहो या सर्व गोष्टी पूर्णपणे लक्षात ठेवा. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद