नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच सर्वपित्री अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या अमावस्या तिथीला सर्वपित्री अमावस्या महालय अमावस्या किंवा विसर्जनी अमावस्या असे देखील म्हटले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार १६ दिवसापासून धरतीवर आलेले आपले पितर अमावस्येच्या दिवशी आपल्या पितृ लोकांमध्ये पुन्हा परत जातात. त्यामुळे या दिवशी पितरांना संतुष्ट करून पाठवले जाते. या दिवशी आपण त्या सर्व पित्रांचे श्राद्ध करू शकता. ज्यांच्या श्राद्धांची तिथी आपल्याला माहित नसते. किंवा काही कारणामुळे आपण ज्यांचे श्राद्ध करू शकलो नाही त्यांचे श्राद्ध या दिवशी आपण करू शकतो.
त्यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि घर परिवारामध्ये आनंदाचे दिवस येतात. मान्यता आहे की या दिवशी श्राद्ध केल्याने पीकर अतिप्रसन्न होतात. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नानानंतर शुभ्र वस्त्र परिधान करून पितरांच्या नावे तर्पण करणे शुभ मानले जाते. आणि विशेष म्हणजे पूजेच्या वेळी आपले मूक दक्षिण दिशेला असावे. हे देखील शुभ मानले जाते.
मान्यता आहे की या दिवशी दीपदान केल्याने घरामध्ये सुख शांती आणि आनंद प्रसन्नता नांदते. नेहमी धनधान्य आणि सुख-समृद्धी नांदते. या अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये जे लोक श्राद्ध कर्म तर्पण पिंडदान इत्यादी करू शकत नाही ते लोक सर्वपित्री अमावस्येला पितरांच्या निमित्त श्रद्धांजली अर्पण करू शकतात.
मान्यता आहे की या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. यावेळी येणारी सर्वपित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी अमावस्येच्या दिवशी अतिशय सकारात्मक सहयोग बनत आहेत. यावेळी अमावस्येला बुध आदित्य योग आणि लक्ष्मीनारायण योग असे संयोग बनत आहेत.
आणि विशेष म्हणजे शुभ आणि सकारात्मक सहयोग बनत आहेत.या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या ६ राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. मित्रांनो अमावस्येच्या ठीक दुसऱ्या दिवशी नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या राशींवर याचाही अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव यांच्या जीवनावर बरसणार आहे.
यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत. आता प्रगतीच्या वाटा यांच्यासाठी मोकळ्या होणार आहेत. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. जीवनामध्ये वारंवार येणारी संकटे याचा दूर होणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
मित्रांनो २४ सप्टेंबर शनिवार रोजी उत्तर रात्री तीन वाजून तेरा मिनिटांनी अमावस्याला सुरुवात होणार असून दिनांक 25 सप्टेंबर रोजी उत्तर रात्री तीन वाजून २५ मिनिटानंतर अमावस्या तिथे समाप्त होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ या सहा राशींच्या जीवनात अतिशय सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.
मेष राशी- मेष राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सर्वपित्री अमावस्येपासून चमकेल आपले भाग्य. अमावस्या पासून बनत असलेल्या शुभ संयुगाच्या प्रभावाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आत्तापर्यंत जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे.शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आनंदाचे दिवस आता आपल्या वाट्याला येतील. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत कराल ज्या क्षेत्रामध्ये आपण चांगले मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हाक अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार करिअर आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. प्रेम जीवनामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. अमावस्येपासून पुढे येणारा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. संसारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. शेतीतून देखील आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहेत.
कार्यक्षेत्रामध्ये आपण करत असलेली मेहनत फळाला येणार आहे. विदेशामध्ये जाऊन व्यापार करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. जुना मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेली आपली स्वप्न पूर्ण होण्याची संकेत आहेत.मागील अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मना सारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल.
मनासारखा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक तंगी पैशाची चंचन आता दूर होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धन लाभाचे योग जमून येणार आहेत. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. सरकार दरबारी अनेक दिवसापासून अडलेली कामे आता पूर्ण होतील. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. सर्वपित्री अमावस्येपासून पुढे सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता इथून पुढे सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कार्यक्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांची आपले संबंध मजबूत बनतील. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर सर्वपित्री अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. अमावस्येला बनत असलेला शुभ संयोग आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. त्याबरोबर ग्रह नक्षत्राची अनुकूलता देखील आपल्याला लाभणार आहे. या काळामध्ये आपल्या राशीमध्ये त्रिग्रही योग बनत आहे. या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येईल. त्यामुळे आपल्या प्रगतीच्या दारी दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.
चोहीकडून आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होईल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. उद्योग व्यापारातून मोठ्या प्रमाणात लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आपली मेहनत फळाला येणार आहे. बहुतेक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर सर्वपित्री अमावस्येचा शुभ प्रभावदिसून येईल. अमावस्येला बनत असलेल्या शुभ संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. त्यामुळे बढतीचे योग सुद्धा या काळामध्ये येऊ शकतात.
आपल्या कामांमध्ये आता वाढ होणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. धनप्राप्तीची योग्य जमून येणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल. परिवारामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट पाहाव्यास मिळणार आहे. घरामध्ये धनधान्य आणि ऐश्वर्याची भरभराट आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे.
इथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. पण या काळामध्ये आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपली कर्म आणि आपले प्रयत्न जर चांगले असतील तर निश्चित आपल्याला चांगले यश या काळामध्ये लाभू शकते. कामामध्ये देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर सर्वपित्री अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. कौटुंबिक जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतनाव आता दूर होणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ दिसून येईल.
नोकरीसाठी मागील अनेक दिवसापासून करत असलेले आपले प्रयत्न आता सफल ठरतील. मना जोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत. उद्योग व्यापारातून भरगोस नफा आपल्या पदरी पडू शकतो. करिअरच्या दृष्टीने प्रगतीच्या दिशेने पाऊल पुढे पडण्याची शक्यता आहे. मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. मानसिक ताणतणापासून आता मुक्त होणार आहात.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर सर्वपित्री अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. अमावस्ये पासून पुढे जीवनाला शुभ कलाटणी प्राप्त होणार आहे. अमावस्येला बनत असलेल्या संयोगाच्या शुभ प्रभावाने जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होईल.
उद्योग व्यापारातून भरघोस नफा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पैशांची अवक आता वाढणार आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता दूर होणार असून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नशीब आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.