नमस्कार मित्रांनो.
वास्तुशास्त्रानुसार घरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे स्वयंपाक घर. वास्तुशास्त्रात स्वयंपाक घराबद्दल अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन केल्यास व्यक्तींना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते असे म्हणतात कारण स्वयंपाक घरात महिला यांचा वापर जास्त असल्याने त्यांनीही काळजी घेणे नक्कीच गरजेचे आहे.
नाहीतर त्यांच्या पतींना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते असे वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाते चला तर मग महिलांनी किचन मध्ये कोणत्या पाच गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
गृहस्थ जीवनात वास्तुशास्त्र ची भूमिका महत्त्वाची असते विशेषतः व्यक्तींनी घर बांधताना वास्तूंची काळजी घेतली पाहिजे कारण घराची वास्तुशास्त्र रचना व्यवस्थित नसेल तर घरात अशांतता राहील. अशातच घराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाक वास्तुशास्त्रानुसार महिलांनी स्वयंपाक घरात काम करताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी त्यासाठी पाच नियम जाणून घेऊया.
असे म्हणतात ती जसे आपण अन्न खातो तसे आपले विचार बनतात त्याचवेळी आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे स्वयंपाक करताना ज्या भावना स्वयंपाक करणाऱ्याच्या मनात असतात त्याच भावना खाणाऱ्याच्याही मनात तयार होतात. म्हणूनच ज्योतिष शास्त्रानुसार स्वयंपाक करणाऱ्यांनी दिशा लक्षात घेऊनच स्वयंपाक करणे आवश्यक आहे असे म्हणतात ज्योतिष शास्त्रानुसार दक्षिण दिशेला तोंड करून अन्न कधीही शिजवू नये असे म्हणतात.
असे केल्याने स्वयंपाकी आणि खाणारा दोघांच्याही जीवनात दारिद्र्य येऊ शकते याशिवाय या दिशेला उभे राहून स्वयंपाक केल्याने नेहमी डोकेदुखी सांधेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. याबरोबरच ज्योतिष शास्त्रानुसार पश्चिम आणि उत्तर दिशेला स्वयंपाक केल्याने नुकसान होऊ शकते. असे केल्याने घरात आर्थिक समस्या उद्भवू शकते एवढेच नाही तर दारिद्र्य येऊ शकते.
मग आता स्वयंपाक करण्यासाठी शुभ दिशा कोणती तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड केल्यास ते सर्वात शुभ मानले जाते. कारण पूर्व दिशाही सूर्याची दिशा मानली जाते आणि या दिशेला सूर्यप्रकाशात सर्वात जास्त असतो. वेगाने पसरतो अशा परिस्थितीत सर्वात सकारात्मक ऊर्जा देखील या दिशेने वास करते म्हणूनच पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करण्यास सांगितले जाते.
शिवाय शेगडी हा किचनचा महत्त्वाचा घटक आहे म्हणूनच ती नेहमी स्वच्छ ठेवायला हवी तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो अगदी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम जाणू शकतो म्हणूनच स्वयंपाक झाल्यानंतर ओटा किंवा गॅस स्वच्छ आवरून ठेवावा आणि शेगडी सुद्धा पुसून ठेवावी. स्वयंपाक घराच्या बाबतीत एक विशेष काळजी घेतली पाहिजे.
ते म्हणजे किचन हे थेट प्रमुख दारासमोर नसावी असल्यास मध्ये पडदा लावणे आवश्यक आहे. आणि ते उत्तम मानले जाते आणि त्याचबरोबर स्वयंपाक घराशेजारी बाथरूम टॉयलेट असेल तर त्यातही पडदा लावावा वतीदार सतत बंद ठेवावीत. हे केवळ दिसणाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही तर आरोग्याच्या ही दृष्टीने महत्त्वाचे आहे.
तसे न केल्यास आरोग्यावर आणि संपत्तीवर त्याचा दुष्परिणाम ही होऊ शकतो. तर स्वयंपाक घरांच्या बाबतीत महिलांनी या गोष्टींची काळजी नक्की घ्यायला हवी. त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकट आरोग्याच्या बाबतीत संकट असो या समस्यांना कधीही सामोरे जावे लागणार नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.