Skip to content

जाणून घ्या. सनी देवांना कर्मफल दाता का म्हणतात. या लोकांवर असते नेहमी शनीची कृपा. 

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्याला आपल्या कर्मांच फळ देतात शनि महाराज, आणि म्हणूनच त्यांना कर्मफल दाता म्हटल जात. जर आपली कर्म वाईट असतील तर आपल्याला त्याची वाईट फळ मिळतील आणि कर्म चांगली असतील तर नक्कीच त्याची चांगली फळ मिळते. पण तुम्हाला हे माहिती आहे का काही खास लोकांवर शनी महाराजांची कायम कृपा दृष्टी असते. मग परिस्थिती कशीही असो. 

कोणती आहेत ती लोक, त्या लोकांमध्ये तुमच नाव आहे का? चला हे सगळ सविस्तर जाणून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाच जी लोक गोरगरिबांना दान करतात. त्या लोकांवर शनि महाराजांची नेहमी कृपा होते. म्हणूनच जर तुम्हाला सुद्धा शनि महाराजांची कृपा हवे असेल, शनि महाराजांची वक्रदृष्टी नको असेल तर दानधर्म करण्याची सवय लावा. गरिबांना त्यांच्या गरजा ओळखून दान करा. 

तुम्हाला नको असलेल्या वस्तू त्यांना देऊ नका. तर ज्या वस्तूंची गरज त्यांना आहे. त्या वस्तू द्या. त्याचबरोबर जे लोक विशेष दिवस सोडून नेहमी आपले नक कापतात आणि त्यांना स्वच्छ ठेवतात. शनि देवांची कृपा त्यांच्यावरही असते. थोडक्यात काय तर स्वच्छ राहणारा व्यक्ती. त्याबरोबर जी लोक कुत्र्याची सेवा करतात. अर्थात कुत्र्यांना सुद्धा भाकरी तुकडा खाऊ घालतात‌ त्यांच्यावर सुद्धा शनि महाराजांनी कृपा राहते.

 त्यानंतर शनिवारचा उपास कमी करता का? करत असाल तर शनि महाराजांची कृपा तुमच्यावरही आहे. आणि करत असाल तर लगेच सांगा. शनि देवांचा वार आहे शनिवार आणि म्हणूनच शनि महाराजांना प्रसन्न करण्यासाठी कितीतरी जन  शनिवारी उपास करतात. जी लोक शनिवारी उपास ठेवतात त्यांना जीवनात कधी संकटांचा सामना करावा लागत नाही. 

जर एखादा संकट आलच तर त्या संकटातून ते तरुण जातात असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर जी लोक नेहमी पिंपळाची पूजा करतात. औदुंबराची पूजा करतात. अशा लोकांवर सुद्धा शनि महाराजांची नेहमी कृपा असते. आणि म्हणूनच शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावायला हवा. 

त्याच बरोबर रुद्राक्ष धारण करणारी व्यक्ती महाराजांची कृपा मिळवण्याचा हा सुद्धा एक मार्ग आहे. जी व्यक्ती रुद्राक्ष धारण करते त्यांच्यावर सुद्धा शनिदेव कृपा करतात. त्याचबरोबर ज्या व्यक्ती आपल्या आई-वडिलांची सेवा करतात आई-वडिलांना अंतर देत नाही. त्यांच्यावर सुद्धा शनि महाराजांची कृपा होते. अगदी संकट काळात सुद्धा त्यांना कुठून तरी मदत मिळते.

असा अनुभव त्यांना आयुष्यात येईल. आणि म्हणूनच सगळ्यात आधी माता पित्याची सेवा करणे हे आपल कर्तव्य आहे. आता मित्रांनो या गोष्टी जर तुम्ही निरीक्षण केल्या तर तुमच्या लक्षात येईल की शनि महाराजांची कृपा स्वच्छ राहणाऱ्या व्यक्तीवर होते. 

आई-वडिलांची मुक्या प्राण्यांची सेवा करणाऱ्या व्यक्तीवर होते. गोरगरिबांना दानधर्म करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा होते. या सगळ्या गोष्टी तुम्ही करता का? करत असाल तर तुम्हाला शनि देवांच्या वक्रदृष्टीला घाबरण्याची आवश्यकता नाही. याबद्दल तुमच मत काय आहे. तुमचा अनुभव काय आहे नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *