Skip to content

दिनांक १६ जुलै संकष्टी चतुर्थी या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षं राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीचे वेगवेगळे महत्त्व सांगितले जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येत असतात. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हणतात. तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. 

मित्रांनो उदाहरणार्थ थोडक्यात अमावस्या नंतर येणाऱ्या चतुर्थीला वरदविनायक चतुर्थी असे म्हटले जाते. तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. मित्रांनो हा दिवस पूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्थित आहे. 

नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत उपास करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि संध्याकाळच्या वेळी चतुर्थीला संकष्टी चतुर्थीची कथा ऐकण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने घरातील नकारात्मक वातावरण किंवा नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होते. 

गणेश भक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो.या दिवशी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त खास करून गणेशाच्या मंदिरात जाऊन पूजा आराधना करतात त्यामुळे मन प्रसन्न बनते.मन समाधानी बनत. मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील वातावरण अतिशय आनंदी आणि प्रसन्न बनते. 

व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी चंद्राचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. सूर्योदयापासून सुरू झालेल्या संकष्टी चतुर्थीचा उपवास किंवा संकष्टी चतुर्थीचे व्रत हे रात्री चंद्र दर्शनानंतर समाप्त होते. यावेळी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व पूर्ण योग बनत आहेत. 

येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी संकष्टी चतुर्थीला ग्रह नक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. दिनांक १६ जुलै रोजी सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत.मित्रांनो १६ जुलै रोजी बुध आणि शुक्र हे दोघेही राशी परिवर्तन करणार आहेत. हे दोघं कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. 

त्यामुळे सूर्य आणि बुध अशी युती होत असल्यामुळे हा संयोग या राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. हा संयोग अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनात अतिशय सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. मित्रांनो आषाढ शुक्लपक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक १६ जुलै रोज शनिवार संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्री ०९ वाजून ४९ मिनिटांनी होणार आहे. 

संकष्टी चतुर्थीला बनत असलेल्या संयोगाच्या अतिशय सकारात्मक प्रभावाने या काही भाग्यवान राशींच्या जीवनात अतिशय सुखद आणि आनंदाचे दिवस येणार आहेत.संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव यांच्या जीवनात आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे.

अतिशय सकारात्मक परिवर्तन आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्य आणि बुधाचे होणारे राशी परिवर्तन अतिशय शुभ ठरणार आहे विशेष करून हा काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनात येणारी संकट आता दूर होणार आहेत. गजाननाच्या कृपेने आपल्या संसारिक जीवनात चालू असलेल्या अनेक अडचणी आता समाप्त होणार आहेत. 

गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.त्यामुळे प्रत्येक दुखातून आपले सुटका होण्याची संकेत आहेत. प्रगतीच्या दिशेने मार्गक्रम करणार आहात. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून देखील मोठे लाभ आपल्याला प्राप्त होतील. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. हा काळ लाभदायी ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे. चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात विशेष अनुकूल फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार आहे. 

आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात. चांगले काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता करियर मध्ये सुद्धा मोठी प्रगती घडून येणार आहे.

कर्क राशि- कर्क राशि वर ग्रह नक्षत्रांचा अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. गजाननाच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

संसारिक जीवनामध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीसाठी येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. संकष्टी चतुर्थीचा हा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असलेला संघर्षाचा काळ आता पूर्णपणे बदलणार असून सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. 

प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवासाचा सुरू होणार आहे. मार्गात येणारे सर्व संकटे आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येणार आहे. मातापित्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. घरातील लोक सुद्धा चांगली मदत करतील.

तुळ राशी- तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून एक जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याची संकेत आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. संसारिक सुखात मोठी वाढ दिसून येईल. 

आपल्या धनसंपत्तीमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. अचानक धन लावायचे योग जुळून येऊ शकतात. आर्थिक परिस्थिती अतिशय अनुकूल बनणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. 

आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये चांगली उन्नती घडून येईल. आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. मनात असलेली उदासी हे भीतीचे वातावरण आता समाप्त होणार आहे. 

आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नव्या जिद्दीने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. आणि प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

मकर राशि- मकर राशि वर संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. आता आपल्या जीवनात शुभकाळाची सुरुवात होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. पैशांची तंगी आता दूर होणार आहे. 

बाहुबली किंवा मित्रांमध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण आता दूर होणार आहे. मैत्रीमध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण आता दूर होणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मधुर बनणार आहे. मित्रपरिवार आणि सहकारी आपली मदत करतील. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. कार्यक्षेत्राला नवी चालणा प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे गजाननाची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत. 

आपल्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे. संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला चांगली साथ देणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *