नमस्कार मित्रांनो.
श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. मी आज तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे. माझे नाव सविता वाघ मी नागपूरची आहे गेल्या दीड महिन्यापूर्वी मला माझ्या मुलीच्या संबंधित स्वामींचा अनुभवाला खूप मोठी प्रचिती मला स्वामिनी त्यावेळेस दिली तर तेच आता मी तुम्हाला सांगत आहे. तर झाल काय की माझी साडेचार वर्षाची मुलगी आहे तिच नाव आहे साक्षी तर असच एके दिवशी माझे मिस्टर सकाळी कामावर निघून गेले आणि आम्ही दोघीजणी घरात होतो.
तर मी थोडसं कपाट आवरलं आणि कपाट कपाट आवरताना माझ्याकडे माझी छोटीशी अंगठी होती चांदीची ती मला बसत नव्हती फिट होत होती म्हणून मी ती बाहेर काढून ठेवली . कारण मला दुपारी काम आवरल्यानंतर ती अंगठी घेऊन जायचं होतं आणि त्याच्या बदल्यात मला माझ्या मापाची अंगठी घेऊन यायची होती. म्हणून मी ते थोडंसं कपाटातल सामान मी बाहेर काढून ठेवलेलं होतं आता त्यानंतर माझी मुलगी खेळत होती आणि मी किचनमध्ये काम करत होते तर असंच काम किचनमध्ये माझ चालू असताना साक्षीचा जोर जोरात रडताना आवाज माझ्या कानावर येऊ लागला.
मी पटकन पळत तिच्याकडे गेले ती रडते आहे, म्हटल्यावर का रडते आहे. हे मला सुरुवातीला कळालच नाही. आणि रडता रडता अचानक तिला दम लागू लागला. अगदी तिचा श्वास कोंडायला झाला अगदी ती खूप असं तिचा श्वास अडकून अडकून ती रडायला लागले तिला काहीही समजत नव्हतं काहीही बोलता येत नव्हत. परंतु ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती मीही खूप घाबरले तिचेही अवस्था बघून कारण असं साक्षीला कधीही झाल नव्हत.
आणि पहिल्यांदाच त्याच्या बाबतीत असं घडत होतो मला काहीही समजत नव्हतं की नेमकं साक्षीला होतय काय परंतु तेवढ्यात तिने मला हाताने इशारा केला आणि घशाकडे बोट करून दाखवलं आणि जिकडे मी सामान ठेवल होत तिकडे हात करायची आणि घशाकडे हात करायची. त्याच्यामुळे मला थोडंसं काहीतरी वाटलं की की हिने काहीतरी तोंडात घातला आहे असं वाटलं आणि पटकन माझ सामानाकडे लक्ष गेल आणि तिथे मला ती अंगठी दिसली नाही.
जाग्यावर आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की इथे अंगठी नाहीये आणि मला तेव्हा पटकन क्लिक झालं की, साक्षीने नक्कीच अंगठी गिळलेली आहे. आणि तिच्या घशामध्ये ती अडकलेली आहे. हा विचार करे करे पर्यंत साक्षी अकितीचा आवाज म्हणजे निघतच नव्हता अगदी तिचा आवाज बसून गेला आणि ती खूप असा दम टाकायला लागले तिला तिचा श्वास अगदी कोंडला मीही खूप घाबरले मलाही खूप घाम फुटला आता काय करावं घरी कोणीही नव्हता मिस्टर घरी नव्हते.
काय करावे तेवढ्यात मी शेजारच्या दादाला पटकन बोलवून आणल. त्यासोबतच शेजारच्या मावशी आल्या आणि तो दादाही आला तेवढ्या वेळात त्याने माझ्या मिस्टरांना फोन लावला आणि घडलेला प्रसंग त्यांनी सांगितला आणि सांगितलं की मी आता वहिनींना घेऊन दवाखान्यात जात आहे. तुम्हीही तिकडे पोहोचा. आणि तातडीने मी त्या दादा सोबत साक्षीला घेऊन दवाखान्यात गेले तिकडे जाईपर्यंत थोडाच वेळात माझे मिस्टरही त्या ठिकाणी आले.
आणि त्या ठिकाणी डॉक्टरांना मी तशी कल्पना दिली की साक्षीने माझ्या मते गिळलेली आहे अस आणि डॉक्टरांनी बघितलं होतं की साक्षाची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे त्यांनी पटकन आणि सोनोग्राफी करायला सांगितले आता तोपर्यंत मिस्टरही आले होते तेही खूप घाबरले होते. होते कारण खरोखर परिस्थिती आम्हाला खूप गंभीर दिसत होती काय होईल काही सांगता येत नव्हत. फक्त सोबतीला होता नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे आम्ही म्हणत होतो.
आणि एकीकडे डॉक्टर त्यांनी त्यांची ट्रीटमेंट करायला सुरुवात केली म्हणजे त्याची काही प्रोसिजर होते ते त्यांनी करायला घेतली आता एकीकडे माझे स्वामी सेवाचा म्हणजे नामस्मरण आता मी मला दवाखान्यातून हलता येत नव्हतं त्यात माझं लक्षही अस ठिकाणावर नव्हत. फक्त साक्षीचाच विचार डोळ्यासमोर येत होता. त्यामुळे वेगळे असे सेवा करणे मला अजिबात शक्य नव्हत. फक्त मी नामस्मरण करत होते परंतु घडलेल्या प्रसंग माझ्या आईला समजलेला होता आणि आईने तातडीने तिकडे स्वामी चरित्र सारामृत एक असणे पारायण करायला घेतल.
एक असली म्हणजे एकाच ठिकाणी बसून जोपर्यंत साक्षीची एका म्हणजे तिचं काय आहे काय नाही हे समजत नाही तोपर्यंत आईने काहीही अन्न पाणी न घेता तिने स्वामी चरित्र पारायण वाचायला सुरुवात केली आता आईचे तिकडे सेवा चालू होती आणि दवाखान्यामध्ये माझा स्वामी समर्थ जप चालू होता. तिची जी अंगठी होती ती घशामध्ये अडकले होते आणि डॉक्टरांनाही काहीही सांगता येत नव्हत.
आता डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की तिची जी घशातली अंगठी आहे ती फार धोकादायक आहे. ती अंगठी एक तर पुढे जायला हवी पोटात गेली तर आपल्याला एक छोटसं ऑपरेशन करून आपल्याला ती पटकन काढता येईल अजूनही दुसरे काही उपचार आपण करू शकतो. परंतु ती अंगठी इथे अडकली असल्यामुळे तिचा श्वास कोंडत होता आणि अगदी गंभीर अवस्थेत गेली होती.
नामस्मरण चालू होतं आणि डॉक्टरांचे प्रयत्नही चालूच होते आता डॉक्टरांच्या प्रयत्नांनी थोडेसे ती अंगठी घशातून पोटाकडे पर्यंत पोहोचली आता पोटापर्यंत पोहोचल्यानंतर डॉक्टर म्हणाले की थोडेसे परिस्थिती गंभीर होती ती काही हे प्रमाणात म्हणजे सुरळीत झालेली आहे असं म्हटल्यावर थोडासा मला सुटकेचा विश्वास म्हणजे आम्ही सोडला परंतु तरीही अंगठी काही बाहेर आलेली नव्हती.
पोटातच होती आता पोटाचा ऑपरेशन करावच लागणार अस आम्हाला वाटल. परंतु थोड्या वेळाने डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, आपण ह्या मुलीला एक औषध देऊन बघूयात त्या औषधाने जर तिला टॉयलेटला जर ती गेली आणि त्या माध्यमातून ती अंगठी बाहेर आली तर नक्कीच आपलं काम खूप सोपं होऊन जाईल.
आणि म्हणून एक पातळ औषध त्यांनी पाजायला सांगितलं आणि ते औषध आम्ही तातडीने तिला दिल आणि आता ते झाल्यानंतर खरोखर त्या ठिकाणी आणि एवढी मोठी गंभीर परिस्थिती त्यातून साक्षी बाहेर आली याची प्रचिती आम्हाला आली. आणि जेव्हा ती टॉयलेटला गेली तेव्हा तिच्याशी पोटातली अंगठी होती त्या माध्यमातून ती बाहेर पडली. आणि तिच्या वरचा धोका होता तो संपूर्णपणे टाळला होता.
आणि खरोखर हे सगळं काही घडलं होतं हो या ठिकाणी डॉक्टरांनी शंभर टक्के प्रयत्न केलेले होते परंतु माझा असं म्हणणं आहे की डॉक्टरांना जे बुद्धी देतात ते आपले स्वामी महाराज असतात. त्यांच्या हातचे काम करतात त्यामध्ये स्वामी शक्ती असते म्हणूनच माझी साक्षी आज माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तेही व्यवस्थित आहे आणि एवढा मोठा संकटातून ते अगदी सहज बाहेर पडली.
परिस्थिती असताना डॉक्टरांनी खूप क्रिटिकल अवस्था सांगितलेला असतानाही माझे साक्षी स्वामींच्या कृपेने अगदी म्हणजे थोडक्यात ती त्या संकटातून वाचली हे खूप मोठे स्वामींचे म्हणजे खूप मोठे उपकार आहे माझ्यावर आणि एवढं म्हणून त्या ताईंनी त्यांचा अनुभव संपवला.
आज काल आपण पेपर मध्ये भरपूर बातम्या वाचतो की मुलं खेळता खेळता नाकात त्यांच्याकडून जातं आणि त्यांचे प्राण त्यांना गमवावे लागतात. लहान मुलांना समजत नाही आणि आपलेही त्यात कुठेतरी जास्त चूक नसते कधीकधी आपणही लक्ष नसतं काही किंवा आपल्या कामात असतो आणि लहान मुलं असतात काय करते काहीच भरोसा नसतो आणि त्यामुळे त्यांच्यावरही त्या ताई वरही अशीच वेळ आली.
होती परंतु स्वामी सोबतीला होते त्यांच्या आईनेही तिच्यासाठी सेवा केली होती आणि नक्कीच त्यामुळे स्वामी महाराज तिच्या मदतीला धावून आले. साधा एक एवढी गंभीर परिस्थिती असताना एकही ऑपरेशन करावं लागलं नाही हे खूप मोठी गोष्ट आहे कारण बघा ऑपरेशन कदाचित झाला हि असतं गळ्यातून जेव्हा माझे घशातून तिची अंगठी बाहेर गेली तेव्हा नक्कीच ती संकटातून बाहेर आलेली होती.
ते परंतु जर कशात म्हणजे पुढे झाल नसत तर आपण विचार करू शकतो की पुढे काय झाल असत. स्वामींच्या कृपेने पोटात आली आणि ऑपरेशनही कराव लागल नाही ऑपरेशन झाल असत. लहान जीव होता तो बघा आपल्याला थोडस काही झाल तरीही आपल्याला किती वेदना होतात तेव्हा लहान जीवाने ते कसं केलं असतं हे स्वामींनी कुठे तरी समजून घेतलं. स्वामिनी या संकटातून या त्रासातून तिला बाहेर काढल.
मित्रांनो हा अनुभव कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा.