Skip to content

माती बनेल सोन, आज २४ जुलै कामिका एकादशी या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील १० वर्ष राजयोग.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येत असतात. एक येते ती कृष्णा पक्षात आणि दुसरी येते ती शुक्लपक्षात. प्रत्येक एकादशीची तिथी आणि नाव हे वेगवेगळे असते. वेगवेगळ्या नावाप्रमाणे त्या एकादशीचे वेगवेगळे महत्त्व देखील असते. 

त्या एकादशीचे वेगवेगळे व्रत देखील केले जाते. आषाढी महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला कामिका एकादशी असे म्हटले जाते. हा दिवस पूर्णपणे भगवान श्री विष्णूला समर्पित मानला जातो. मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर करणारी ही एकादशी मानली जाते. 

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत उपास केले जातात. या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. कानिका एकादशी दिवशी घर स्वच्छ करून माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू ची पूजा केली जाते. पंचामृत आणि भगवान विष्णूंचा अभिषेक सुद्धा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. 

जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश व्हावा यासाठी हे एकादशीचे व्रत केले जाते. एकादशी दिवशी नदीत स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो एकादशी दिवशी मनात कोणतेही वाईट विचार येऊ देऊ नयेत. या दिवशी मन अगदी स्वच्छ आणि निर्मळ असू द्यावे या दिवशी मास मदिरे पासून दूर राहणे देखील विशेष महत्त्वपूर्ण आहे. 

दिवसभर भगवान विष्णूचे नाम स्मरण करणे किंवा विष्णुसहस्त्रनामाचा जप करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे मान्यता आहे की कानिका एकादशी केल्याने सर्व पापान पासून मनुष्याला मुक्ती मिळते. येणारी ही एकादशी या सहा राशिंसाठी महत्त्वपूर्ण किंवा शुभ फलदायी ठरणार आहे. 

यांच्या जीवनातील सर्व दुःख आता दूर होणार आहेत. जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या जीवनात आता आनंदाची बहार येण्याची संकेत आहे. भोगविलासतीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. घर परिवारात आनंदाची बहार येणार आहे. 

एकादशी पासून पुढे येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अधिक बदल घडवून येणार आहेत. जीवनात मोठी प्रगती घडून येणार आहे. कौटुंबिक सुखात देखील मोठी वाढ दिसून येईल. मित्रांनो आज आषाढ कृष्णपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक २४ जुलै रोजी रविवार कानिका एकादशी आहे. 

एकादशी पासून पुढे येणाऱ्या काळ या ६ राशीसाठी अतिशय लाभदाई ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा बरसणार आहे. इथून पुढे येणाऱ्या काळ आपल्या जीवनात विशेष लाभदायी ठरणार आहे. हा काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. या काळात गृह नक्षत्राची स्थिती आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे जी असतील ती या काळात करून घेणे आवश्यक आहे. 

मित्रपरिवार आणि सहकारी सुद्धा या काळात आपल्याला मदत करू शकतात. नातेवाईक सुद्धा मदतीला धावून येण्याची संकेत आहेत. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. भाऊबंदुकीमध्ये प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. सासरकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. 

संततीची प्राप्ती सुद्धा होऊ शकते. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या काळात आपली कर्म चांगले ठेवण अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची भक्ती आराधना करून उपवास केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धीची बहार येणार आहे. 

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनात एकादशीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. घर परिवारात सुख समृद्धीची भरभराट पहावयास मिळेल. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आर्थिक आवक सुद्धा वाढणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. बेरोजगारांना मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. नोकरीच्या अनेक संधी या काळात आपल्याला मिळू शकतात. जीवन सुखी आणि समृद्धी बनणार आहे.

आपल्या जीवनातील जो काही दुःखाचा काळ आहे तो समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. पण मित्रांनो कष्ट मात्र आपल्याला करावेच लागणार आहेत. आपण जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे जास्त चांगले फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची पूजा अर्चना करणे आणि वृत्त उपवास करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. 

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. भगवान विष्णूंच्या कृपेने कुटुंबात प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला  प्राप्त होईल. अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असतील. बढतीचे योग येऊ शकतात. 

या काळात नोकरीमध्ये परिवर्तन घडून येऊ शकते. माता पित्यांच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. करिअरच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात विस्तार होऊ शकतो. आपल्या कमाई मध्ये चांगली वाढ दिसून येईल. 

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनावर एकादशीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. एकादशीपासून पुढे जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होऊ शकते. आता इथून पुढे भाग्याची साथ लाभणार असल्यामुळे नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आम्ही आवश्यक आहे. 

जेवढे चांगले आपण प्रयत्न कराल तेवढे सुंदर फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नात आपल्याला यश प्राप्त होईल. घर परिवारात सुख समृद्धी आणि वाढ होण्याची शक्यता आहे. वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. 

तूळ राशी- तूळ राशीवर एकादशीचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनात आनंददायी वातावरण निर्माण होणार आहे.  मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. उत्तम प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहे. आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. 

मकर राशी- मकर राशि साठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. एकादशीपासून जीवनात प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत. मोठी प्रगती आपल्या जीवनात होणार आहे. 

आर्थिक प्रश्न मिटणार आहेत. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे0 कौटुंबिक सुखात देखील वाढ दिसून येईल नातलग आपले चांगली मदत करणार आहेत. या काळात मित्र परिवाराचे मदत सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे आता इथून पुढे आपल्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. 

कुंभ राशि- कुंभ राशीचे जीवनात एकादशीपासून पुढे येणारा काळ विषय ठरणार आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. या काळात आपल्या जीवनात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार आहेत. 

सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आतापर्यंत अनेक अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत. याकाळात अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येणार आहेत. हा काळ आपल्याला सुखाचा काळ ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. आणि आता चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *