Skip to content

रविवारी सकाळी एक तेज पत्ता जाळून तर पहा एक इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो रविवारी सकाळी सूर्यदेवांकडे पाहत आपण हा एक छोटासा उपाय नक्की करा. आपल्या मनातील तमाम प्रकारच्या इच्छांची पूर्तता सूर्यदेव नक्की करतील. आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण होतील आणि हा उपाय करण्यासाठी जी सामग्री लागते. ती म्हणजे फक्त एक तेजपत्ता. 

आपल्या स्वयंपाक घरात किचनमध्ये मसाल्याच्या पदार्थांपैकी हा एक पदार्थ, मित्रांनो हा तेज पत्ता जेव्हा जेव्हा आपल्याला भीती वाटेल एकाकी वाटेल अस्वस्थ वाटेल तेव्हा हा तेज पत्ता घ्या आणि तो जाळा. तुमच्या मनातील सगळ्या प्रकारची भीती नकारात्मक विचार यामुळे निघून जातात. तुम्ही एखाद्या निर्जन ठिकाणी जात आहे. 

अनोख्या ठिकाणी जात आहे. आणि मनामध्ये भीती वाटते हा तेज पत्ता सोबत घेऊन जा आणि भीती वाटू लागली की तो जाळा तुम्हाला दिसून येईल मनातील भीती दूर होते. या तेज पत्त्याच महत्त्व खूप मोठा आहे. तंत्रशास्त्रात लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी पैसा प्राप्त करण्यासाठी या तेजपत्त्याचा अनेक प्रकारे वापर केलेला दिसून येतो. 

मित्रांनो रविवारच्या दिवशी सकाळी आपण या तेज पत्त्याचाच वापर करून सूर्य देवांना प्रसन्न करणार आहोत. आणि आपली इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहोत. यासाठी आपण रविवारी सकाळी लवकर उठाव आणि स्वच्छ स्नान करून हा उपाय करण्यास प्रारंभ करावा. हा उपाय करण्यासाठी एक तेज पत्ता घ्यायचा आहे. 

जो किडलेला किंवा खराब झालेला नसावा. असा एक तेज पत्ता घेऊन आपण त्या तेजपत्त्यावर लाल शाईने मग तुम्ही स्केचपेन सुद्धा वापरू शकता. या तेजपत्त्यावर लाल रंगाच्या साईने तुमच्या मनात जी इच्छा आहे. मनोकामना आहे. ती इच्छा थोडक्यात लिहायची आहे.

 ती इच्छा लिहिल्यानंतर त्याखाली आपण सूर्य देवांचा मंत्र ओम सूर्य देवाय नमः हा मंत्र लिहायचा आहे. ओम सूर्याय नमः आणि त्याखाली एक हा अंक लिहायचा आहे. एक हा नंबर सूर्याशी संबंधित आहे. सूर्य देवांचा हा नंबर आहे. अशा प्रकारे आपण हे लिहिल्यानंतर एक दिवा त्याठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. 

सूर्य देवांच्या नावाने ज्याची वात ही पूर्व दिशेला असेल आणि हा तेजपत्ता याच दिव्याच्या ज्योतीवर धरून आपण जाळायचा आहे. जाळल्या नंतर त्याची जी राख खाली पडेल. ती राख एका पात्रामध्ये एखाद्या वाटीमध्ये गोळा करायची आणि ही राख सूर्यदेवांकडे पाहत आपण पूर्व दिशेला फेकायचे आहे उधळायची आहे.

ही राख हे भस्म अशा प्रकारे उधळल्यानंतर आपण तांब्याभर पाणी घ्यायचे आणि या तांब्यावर पाण्यामध्ये एखाद्या लाल रंगाचे फुल थोडीशी चिमूटभर हळद टाकून आपण आणि एक गुळाचा छोटासा खडा आणि सूर्य देवाकडे पाहत आपण हे अर्घ्य सूर्य देवांना अर्पण करायच आहे. 

अर्घ्य अर्पण करणे म्हणजे काय तर आपल्या दोन्ही हातात हा तांब्या व्यवस्थित हात उंचावून हे अर्घ्य हे पाणी सूर्य देवास अर्पण करायच आहे. ओतायच आहे. हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः या मंत्राचा सातत्याने आपण जप करा. ७ वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर जी तुमची इच्छा आहे मनोकामना आहे ती सुद्धा आपण सात वेळा बोलून दाखवायचे आहे. 

तीच इच्छा की जी आपण त्या तेजपत्त्यावरती लिहिली होती. या तेज पत्त्याला अनेकजण तमालपत्र असंही म्हणतात. अशा प्रकारे सात वेळा ही इच्छा बोलल्यानंतर मनोभावे हात आपण जोडायचे आहेत. सूर्यदेवांना प्रणाम करायचा आहे. मित्रांनो हा उपाय या ठिकाणी संपलेला आहे. 

ज्यावेळी तुमची ही इच्छा मनोकामना पूर्ण होईल. त्यावेळी आपण जो उपाय केला सूर्य देवांना आपण ज्या प्रकारे प्रसन्न केल. अगदी त्याच प्रकारे तुमच जे कुलदैवत आहे कुलदेवी आहे त्यांचा सुद्धा स्मरण आपण नित्य ठेवा. जेणेकरून जे फळ तुम्हाला मिळाल ते फळ इष्ट देवांच्या कृपेने कधीच कमी होणार किंवा विपरीत फळाची प्राप्ती कधीच होणार नाही. नक्की करून पहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *