नमस्कार मित्रांनो.
१३ जुलै रोजी शुक्रदेव मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रात शुक्राला भौतिक सुखाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह लवकरच मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हे संपत्तीचे प्रतीक आहेत. १३ जुलै ते ०७ ऑगस्ट या कालावधीत शुक्र मिथुन राशीत राहील.
यानंतर शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या या संक्रमणाचा काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया शुक्राच्या मिथुन राशीत होणाऱ्या भूचरामुळे कोणत्या राशीची लोक अडचणीत येणार आहेत.
त्यातील सर्वात पहिली रास आहे वृषभ रास.
वृषभ रास- या भूचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. या काळात तुम्हाला तुमच्या टीमच्या निष्काळजीपणामुळे तणाव आणि समस्यांना सामोरे जावे लागेल. इतकच नाही तर तुमचा तुमच्या वरिष्ठांशी काही वाद होण्याची सुद्धा शक्यता आहे. ज्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो.
कर्क रास- मिथुन राशीत शुक्राच्या गोचरातमुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक समस्या आणि सुविधांच्या अभावाला सुद्धा सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमचं कौटुंबिक जीवनही अस्थिर होऊ शकत. कौटुंबिक संबंध आणि समस्यांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.
या काळात तुम्हाला त्वचेशी संबंधित काही आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात. त्यामुळे थोडी काळजी घ्यावी. या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. परिणामी तुमच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याच्या स्थितीत तुम्ही नसाल. पण थोडेसे योगासन आणि प्राणायाम करून मन शांत ठेवा.
वृश्चिक राशि- आर्थिक समस्या अनियंत्रित खर्चाचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ सुद्धा कमी घालवाल. तुम्हाला सल्ला दिला जात आहे की वाद टाळा तुमच्या शब्दांवर ठाम राहा. त्याचबरोबर तुम्हाला आरोग्याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. कारण खांदे दुखी आणि मानेशी संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे.
मकर रास- शुक्राच्या या भूचरामुळे मकर राशीच्या लोकांना आर्थिक प्राप्ती होणार नाही. तुम्हाला लाभ मिळाला तरी त्याचा पूर्णपणे वापर तुम्ही करू शकणार नाही. तुमचे खर्च वाढू शकतात त्यामुळे पुढे तुम्ही थोडे चिंतेत राहाल.
या काळात तुमच्यावर नोकरीचा दबाव जास्त असेल. तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे अपेक्षित फळ तुम्हाला मिळू शकणार नाही. वैयक्तिकरित्या हे गोचर तुमच्यासाठी थोडसं अवघड आहे.
मीन रास- मीन राशीच्या लोकांनी या दरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला या कालावधीत तुम्हाला म्हणता किंवा वाहन खरेदी किंवा गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांनी देखील कामाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कदाचित तुमची जबरदस्ती ट्रान्सफर होईल यादरम्यान तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कौशल्य सिद्ध करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.