नमस्कार मित्रांनो.
३ सप्टेंबरला आहे, श्रावणातली संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी का खास आहे या दिवशी कुठले उपाय केल्याने काय लाभ होतो. दुर्वांचे काही उपाय या दिवशी विशेष मानले जातात काय आहेत ते उपाय चला जाणून घेऊयात.
मित्रांनो गणपती बाप्पाच्या उपासनेचे अनेक लाभ मनुष्याला मिळत असतात आता गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे सहाजिकच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गणेशाची उपासना करायला सांगितली जाते. गणपती बाप्पाची उपासना जर लहान मुलांनी केली.
तर त्यांना अभ्यासामध्ये गती प्राप्त होते मोठ्या माणसांनी गणेशाची उपासना केली तर त्यांच्या कार्यातली सगळी विघ्न दूर होतात. म्हणूनच गणपतीची उपासना खास मानली जाते आणि ती प्रत्येकाने करावी. पण गणपतीची उपासना कशी करावी सगळ्या साधी सोपी उपासना आहे गणपती बाप्पाची.
गणपती बाप्पाच्या उपासनेत महत्त्वाची असते संकष्टी चतुर्थी जी प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास केलात किंवा तुम्ही गणपती बाप्पा साठी एखादा स्तोत्र म्हटलं किंवा एखाद्या मंत्राचा जप केला तर गणपती बाप्पाची नियमित उपासना होते. गणपती बाप्पाची उपासना कशी करावी किंवा या श्रावणी संकष्टी चतुर्थीला दुर्वांचे असे कुठले खास उपाय केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात ते आपण आता बघणार आहोत.
बाप्पांच्या आवडत्या दूर्वा शिवाय गणपती बाप्पाची उपासना अधुरी मानली जाते म्हणूनच जेव्हा जेव्हा गृह प्रवेश मुंज इत्यादी शुभ कार्य केली जातात गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात. बुधवारी आणि संकष्टी चतुर्थीच्या पूजेतही दुर्वा वापरल्या जातात. या दिवशी दुर्वांचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरतात. आता जर तुम्ही समजा आर्थिक संकटातून जात.
असाल तुमच्याकडे पैसा नसेल किंवा पैशाची कमतरता भासत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये दोऱ्याला ११ गाठी घालून दुर्वांचा छोटासा हार तयार करा आणि हा हार बाप्पाला अर्पण करा. असे केल्याने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते. जर तुमची मनोकामना पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेला गंध कपाळाला लावा. असे केल्याने सुद्धा इच्छित मनोकामना लवकर पूर्ण होते.
ज्योतिष शास्त्रानुसार घरातील संकटांपासून सुटका होण्यासाठी रोज गाईला चारा किंवा दुर्वा खायला घाला असे केल्याने सुद्धा कौटुंबिक भावना वाढतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला २१ दुर्वांचे त्रिदल अर्पण करा. त्यावर अथर्वशीर्षाची २१ आवर्तन करा जर तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणण्यामध्ये अडचणी येत असतील तर कमीत कमी ते अथर्वशीर्ष श्रवण करा.
त्यामुळे सुद्धा गणेश कृपा प्राप्त होते गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही याउलट आपल्या कामात यश मिळते. कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते असेही मानले जाते. बुधवारी किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिरात ११ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो. म्हणजे कुंडली मध्ये जर बुध ग्रहाची संबंधित काही दोष असेल तो दूर होतो आता बुध ग्रहाची संबंधित काही दोष आपल्या कुंडलीत आहेत हे कसे ओळखायचे?
तर पाणी मध्ये दोष आढळतात त्याचबरोबर काही गोष्टी लक्षात राहत नाहीत गोष्टी लक्षात ठेवायला अडचणी येतात आणि सगळ्यात महत्त्वाचे घरात पैसा टिकत नाही हे सगळे दोष बुध ग्रहांशी संबंधित आहेत आणि जेव्हा असे दोष आपल्या घरामध्ये असतात.
तेव्हा ज्योतिष शास्त्रानुसार गणेशाची उपासना करायला सांगितली जाते आणि गणपती बाप्पाची उपासना करायचा सगळ्यात उत्तम दिवस असतो संकष्टी चतुर्थी. त्यातही श्रावणी संकष्टी चतुर्थीला तुम्ही काही उपाय करून बघा तुमच्या अडचणी गणेशाच्या कृपेने लवकरच दूर होतील. गणपती बाप्पा मोरया.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.