Skip to content

१० जानेवारी २०२३ अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा हा उपाय, कर्जमाफी, प्रगती यासाठी अंगारकी संकष्टीला करा हा उपाय.

नमस्कार मित्रांनो.

पैशांच्या समस्याने तुम्ही त्रस्त आहात का आलेला पैसा टिकत नाही का. कर्ज खूप झालाय का. आर्थिक समस्या सुटत नाही असं वाटतंय का? अहो मग येत्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही काही खास उपाय करून या सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकतात. कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया.

जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. १० जानेवारीला ही अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे. जो व्यक्ती या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आणि उपवास करतो त्याची सर्व संकट दूर होता.

इतकच नाही तर या दिवशी काही विशेष उपाय केल्याने व्यक्ती कर्जापासूनही मुक्ती मिळू शकतो. त्याचबरोबर त्याच्या धनसंपत्तीशी संबंधित समस्या सुद्धा दूर होऊ शकतात. अनेक वेळा माणसाला मेहनत करूनही यश मिळत नाही. त्यामुळे अशा स्थितीत गणेशाची पूजा केल्याने नक्कीच लाभ मिळतो. यशासाठी भगवान श्री गणेशाच ध्यान करताना म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कार्यामध्ये यश मिळवायचा असेल.

तुम्ही एखादा कार्य हातात घेतला असेल आणि ते यशस्वी होण्यासाठी तुम्ही अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच दहा तारखेला गणपती बाप्पाचा ध्यान करताना श्री गणेशाय नमः या मंत्राचा किमान ११ किंवा २१ वेळा जप करा. हा जप तुम्हाला भक्ती पूर्ण अअंतकरणाणे करायचा आहे. हे मात्र लक्षात ठेवा. व्यवसायात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला ११ दुर्वांची जोडी अर्पण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला व्यवसायात यश मिळेल.

त्याचबरोबर कर्जाची समस्या ही सुटेल. अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदक किंवा बुंदीचे लाडू नक्की अर्पण करा. संकष्टी चतुर्थी व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही प्रत्येक बुधवारी हे उपाय करू शकतात. असं केल्याने तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. किंवा तुमच्या काही आर्थिक प्रश्न असतील तर ते प्रश्न सुटेपर्यंत दर बुधवारी आणि दर चतुर्थीला हे उपाय तुम्ही करत राहा. जर एखाद्या व्यक्तीला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन सर्व नियमानसह त्याची पूजा करा.

तसेच ओम गं गणपतये नमः या मंत्राचाही जप करा. असं केल्याने तुम्हाला लवकरच फायदा दिसून येईल. घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी श्री गणेशाला पाण्याचा अभिषेक करा. आणि नंतर ते पाणी घरभर शिंपडा असं केल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

आता अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल व्रत करणार असाल तर या दिवशी तुम्हाला व्रत आणि उपवास कसा करायचा ते सुद्धा जाणून घ्यायला हवं. या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत केलं जातं आणि त्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर लाल रंगाचे कपडे घाला.

त्यानंतर गणेशाची पूजा करताना आपलं तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असेल असं बसा. त्यानंतर गणेशाची पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे असेल असं बघा. त्यानंतर गणपतीची मूर्ती व्यवस्थित सजवा. पूजेत लाल फुलं तीळ गूळ वापरा. तांब्याच्या कलशात पाणी घ्या. त्याचबरोबर नैवेद्यासाठी मोदक लाडू फळ आणि धूप दीप चंदन हे सगळेच घ्या. त्यानंतर गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करा. आणि गणपती बाप्पाला २१ दुर्वांची जोडी ही अर्पण करा.

आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर गणेशाचं ध्यान करायला विसरू नका. डोळे बंद करून बसा मनामध्ये गणेश मूर्ती आठवा आणि त्या गणेश मूर्तीच ध्यान करा. सगळं झाल्यावर आरती करा संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतर संकष्टी व्रत कथेचा पाठ करा. आणि पूजा करून आरती करून मग उपवास सोडा गणपती बाप्पा मोरया.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *