नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मातील चतुर्थी दीदीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण या दिवशी करवा चौथ हे व्रत देखील साजरे केले जाते. या चतुर्थीला करक चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते. चतुर्थी तिथीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात.
एक येते ती शुक्ला पक्षात आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरदविनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. यावेळी येणारी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो.
मान्यता आहे की, या दिवशी व्रत उपास करून भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होते आणि सुख-समृद्धीची भरभराट होते. भगवान श्री गणेशाची श्रद्धा पूर्ण अंतकरणाने भक्ती आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते. त्यामुळे हे व्रत अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.
आणि विशेष म्हणजे यावेळी करवा चौथ सुद्धा याच दिवशी साजरा होणार आहे त्यामुळे महिलांसाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून महिला या दिवशी करवा चौथ हे व्रत करत असतात आणि रात्रीच्या वेळी चंद्राच्या पूजेनंतर या व्रताची समाप्ती होत असते. दिवसभर महिला पाणी देखील पीत नाहीत.
हे व्रत अतिशय कडकपणे पाळले जाते. विवाहित महिला हे व्रत अतिशय काटेकोरपणे पूर्ण करतात. मान्यता आहे की हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्याची प्राप्त होते. आणि जीवनामध्ये घर परिवारामध्ये सुख समृद्धी कायम राहते. त्यामुळे हे व्रत मोठ्या भक्ती भावाने आणि श्रद्धा पूर्ण अंतकरणाने केले जाते. यावेळी संकष्टी चतुर्थीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत.
यावेळी सिद्धी योग बनत असून रोहिणी नक्षत्रावर संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ हे व्रत साजरे होणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवक उठून स्नान केल्यानंतर भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा रदना करणे शुभ मानले जाते. आणि या रात्री देखील भगवान श्री गणेशाची पूजा आराधना करून चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राची पूजा करणे देखील लाभकारी मानले जाते.
अश्विन कृष्णपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक १३ ऑक्टोंबर गुरुवार रोजी संकष्टी चतुर्थी करवा चौथ साजरा होणार आहे. चतुर्थीला बनत असलेल्या शुभ संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीवर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय शुभ फलाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग वापर करियर कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती होण्याची संकेत आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. कुटुंबामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या हातात समाप्त होणार आहेत.
प्रेम जीवनाविषयी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. नोकरीसाठी अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. या काळामध्ये विदेश यात्रा घडण्याचे योग सुद्धा बनत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशाला लाल रंगाची फुले अर्पित करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या लोकांवर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसण्याचे संकेत आहेत. जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचा काळ आपोआप दूर होणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.
वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. त्यामुळे बडतीचे योग येऊ शकतात. आपल्या कमाईच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. श्री गणेशाच्या कृपेने आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशाला मधुकर पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. यांच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ठरू शकतो. त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे मानसिक ताण आता दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मनाला अनेक दिवसापासून सतवणारी चिंता आता दूर होणार आहे.
घरात चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीची अनेक साधने आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धनप्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. त्यामुळे जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. येणारा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ ठरू शकतो. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशाला लाल रंगाच्या फुलांचा हार अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. घरात परिवारात देखील आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सरकारी कामांमध्ये देखील चांगले लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतील. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरू शकतो. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. संत तिच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे.
तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
मानसिक ताण तणावापासून आता मुक्त होणारा आहात. घर परिवारामध्ये आनंद आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. प्रेम जीवनाविषयी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम संबंध मजबूत बनणार आहेत. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. श्री गजानन च्या आशीर्वादाने जीवनामध्ये अतिशय सुंदर फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात.
आपल्या मनाला एक सकारात्मक प्रेरणा आता प्राप्त होऊ शकते. सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास आता सुरू होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. संसारिक सुखामध्ये देखील वाढ दिसून येईल. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरू शकतो. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे संकेत आहेत.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. धनप्राप्तीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
या काळामध्ये बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. काम आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. मनाला सतवणारे चिंता आता दूर होणार आहेत. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.