नमस्कार मित्रांनो.
शनिच नाव उच्चारलंना अनेकांचे घाबरगुंडी उडते. त्यांनी आपल्या राशीला येऊच नये अस अनेकांना वाटत असत. पण तस शक्य नाही. कारण कुंडलीतील ग्रहस्थिती नित्य बदलत असते. त्यामुळे शनी गोचर प्रत्येक राशीत होतच राहणार. त्यामुळे शनीला टाळणे अशक्य आहे. पण पण योग्य वेळी योग्य ती काळजी घेतली तर शनीचा प्रभाव कमी करता येतो अस ज्योतिष शास्त्र सांगत.
विशेषतः जेव्हा शनि बरोबर राहू केतू जोडले जातात तेव्हा सावधगिरी बाळगण्याची गरज असते. आता १७ जूनलाच बघाना शनि रास बदलत आहेत. शनि महाराज आपल्या गृहस्थाने म्हणजे आपल्या कुंभ राशी मध्ये पुढील सहा महिने जाणार आहेत. अशा स्थितीत शनि बरोबर राहू केतू सुद्धा ऑक्टोबर महिन्यापर्यंत वक्री चालतील. त्यामुळे या तिन्ही ग्रहांची वक्री चाल सहा महिने परिणामकारक ठरणार आहे.
ग्रहांच्या या वक्री चालीमुळे जून ते नोव्हेंबर या काळात सिंह राशि बरोबर आणखी चार राशी आहेत. त्यांना आर्थिक करिअर आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये सावधगिरी वाळण्याची गरज आहे. शनि राहू आणि केतू मिळून या राशींना त्रासदायक ठरू शकतात. पण मग त्यात उपाय काय आणि त्या राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊयात.
१) कर्क रास – शनि सोबत राहू केतूच्या स्थलांतरामुळे कर्क राशीच्या लोकांना पुढचे सहा महिने करिअर बरोबरच आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कर्क राशीसाठी राहू केतू आणि शनि प्रतीगामी असल्याने आर्थिक बाबतीत त्रास होऊ शकतो. अचानक खर्चात वाढ होईल. खर्च हता बाहेर केल्या असता कर्जाचा डोंगर साचू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.
नोकरीतील गोंधळ आणि तणाव वाढल्याने राग आणि चिडचिड वाढेल. जोडीदाराच्या तब्येतीमुळे किंवा त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कुटुंबातील जीवनात वेळोवेळी तणाव निर्माण होतील. काही कौटुंबिक समस्यांमुळे तुम्हाला मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. पण काळजी करू नका यावर उपाय आहे तो या लेखाच्या शेवटी आहे.
२) सिंह रास- सिंह राशीसाठी सांगायच झाल तर तुमच्या मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने तुम्ही निराश होऊ शकता. नोकरीमध्ये तुमची रुची राहणार नाही. नवीन नोकरीसाठी मनात उलथापालथ होईल. पण या दरम्यान तुम्ही कुठेही जाल तरी तुम्हाला मानसिक शांती मिळणार नाही. त्यामुळे विचार करूनच कोणताही निर्णय घ्या.
व्यवसायात मिळालेला पैसा अडकू शकतो. कोणत्याही कायदेशीर समस्या किंवा तांत्रिक कारणामुळे तुम्ही तणावग्रस्त व्हाल. दरम्यान नवीन क्षेत्रात धोका पत्करणा टाळा. प्रत्येक कामामध्ये अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. अन्यथा तुम्हाला त्यांचा रोज आणि नाराजी कामावर जाव लागू शकत. काळजी करू नका, काळजी घ्या.
३) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांनी पुढील सहा महिने शनिच्या प्रतीगामी संक्रमणा दरम्यान अत्यंत सावधगिरी बाळगण आवश्यक आहे. यादरम्यान राहू केतू सोबत त्यांनी तुम्हाला कौटुंबिक तसेच करिअर आर्थिक बाबतीमध्ये अडकवणार आहेत. या काळात आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात आर्थिक गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांचा त्यांच्या भागीदाराशी मतभेद होऊ शकतात. योग्य कागदपत्राशिवाय कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नका. अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो. त्या दिवसांमध्ये अनावश्यक खर्च झाल्यामुळे आर्थिक बाजू ढासळू शकते. त्यामुळे कोणताही खर्च करताना दहा वेळा विचार करा.
४) मीन रास- मीन राशीची लोक सध्या साडेसातीच्या पहिल्या चरणातून जात आहेत आणि राहू आणि केतू सह शनीचे प्रतीकामी संक्रमण मीन राशींच्या लोकांना मानसिक आणि आर्थिक समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे तुम्ही अंधश्रद्धाकडे झुकू शकता. तर थोडी सावधगिरी बाळगा अथवा अंधश्रद्धेकडे झुकू नका. तुमच्या वागण्यात कटूता येऊ देऊ नका. स्वभावातील बदलामुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनात आणि कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो.
वाद आणि जोडीदारासोबत समन्वयाच्या प्रभावामुळे घरातील वातावरण बिघडू शकते. तुमचे पैसे आरोग्यावर खर्च होऊ शकतात. कधी जुनी समस्या पुन्हा डोके वर काढेल. यावेळी तुम्हाला दृढता आणि संयमाने नातेसंबंध घट्ट धरून तुमच्या कार्यक्षेत्रातही कामावर लक्ष केंद्रित करायचा आहे.
उपाय- हे उपाय सगळ्या राशींसाठी आहेत. सगळ्या राशीने ज्यांच्यासाठी हा काळ कठीण त्यांनी हे उपाय करायचे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हनुमानाची उपासना करायचे आहे. हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र रोज म्हणायला सुरुवात करा. कोणताही एक उपाय करा जो तुम्हाला लाभदायक ठरेल. त्याचबरोबर कोणाशी खोटे बोलू नका. खोटे व्यवहार करू नका. ते अंगलटी येतील.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे दानधर्म करा. शनि महाराजांना गरीब व्यक्तींना दानधर्म केलेला आवडत. गरिबांची सेवा केलेली आवडते ती तुम्ही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे घरातील ज्येष्ठांच्या अपमान करू नका. तुमचे आई-वडील असतील सासू-सासरे असतील त्यांच्याशी चांगल वागा. बोलून त्यांच मन दुखावू नका.
त्यांची सेवा करा ती तुम्हाला लाभदायक ठरेल. सगळ्यात महत्त्वाच तुमच्या हाताखालील काम करणाऱ्या सिद्धार्थ चांगले बोला चांगले वागा त्यांचा कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका. या काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली तर हा काळ तुमच्यासाठी नक्कीच सुसह्य असेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.