नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचा आगमन होत आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचा विसर्जन केल जात. पण नांदेड जिल्हात मात्र असा एक गणपती बाप्पा आहे त्याचे विसर्जनच केले जात नाही. अगदी ७५ वर्षापासून या गणपतीचे विसर्जन केले गेल नाही. उलट गणेश उत्सव संपल्यानंतर या गणेशाला पेटीमध्ये ठेवून दिल जात. या मागचा कारण काय आहे बरं चला जाणून घेऊया.
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातील पाळज हे गाव तेलंगणाच्या सीमेलगत असलेले हे गाव या गावातील श्री गणेशाची स्थापना १९४८ ला करण्यात आली. तेलंगणा राज्यातील निर्मल इथून एका कारागिराकडून आकर्षक अशी गणेशाची लाकडी मूर्ती बनवली. गणेशोत्सव काळात पाळधीत त्याची स्थापना केली जाते. मात्र त्याचे विसर्जन केलं जात नाही त्याचा कारणही तसच आहे.
१९४८ ला गावातले आणि गॅस्ट्रोची साथ आली. तेव्हा गणपती उत्सवात ही श्रींची मूर्ती स्थापन करण्यात आली होती आणि तेव्हा अकरा दिवसात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळाल अस गावकरी सांगतात. त्यानंतर गावकऱ्यांनी या मूर्तीचा विसर्जन करायच नाही.
असा ठरवल आणि तेव्हापासून गणेश उत्सवाच्या काळात या सुंदर लाकडी मूर्तीची ११ दिवस पूजा केली जाते आणि या गणेशा समोरच एक दुसरी गणपतीची मूर्ती ठेवण्यात येते आणि त्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत.
पण ही लाकडी मूर्ती मात्र अकरा दिवसांच्या पूजेनंतर पुन्हा ठेवून दिले जाते. या गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात राजस्थान अशा सगळ्या राज्यातून भाविक येतात. गेल्या ७५ वर्षांपासून हा उत्सव अशाच पद्धतीने साजरा केला जातो.
पूर्वीच्या काळी गणरायाने गावकऱ्यांची संकटातून सुटका केली आणि म्हणूनच तेव्हापासून हा गणेशोत्सव अशाच पद्धतीने साजरा करण्याची प्रथा सुरू आहे. मित्रांनो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटा साजरा केला जातो.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.