नमस्कार मित्रांनो.
आठ नोव्हेंबर २०२२ रोजी आहे खग्रास चंद्रग्रहण. आणि ह्या चंद्रग्रहणामध्ये तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. लक्ष्मी प्राप्त करण्याची, एक चांगला उपाय आहे जो चंद्रग्रहणामध्ये तुम्ही केला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. तुमची जी काही आर्थिक चंचन असेल जी काही पैशांची समस्या असेल ती नक्की सुटेल अस म्हटल जात. मग कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया.
मंडळी ८ तारखेला जे खग्रास चंद्रग्रहण आहे ते दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होईल. आणि ह्या ग्रहणाची समाप्ती होईल ०६ वाजून १९ मिनिटांनी. मोक्ष होण्याचा कालावधी असेल साधारण ०३ तास ४१ मिनिटे. आता गावानुसार यामध्ये काही फरक असू शकतो. आता ०८ तारखेला सूर्योदया पासूनच या ग्रहणाचे वेद पाळायचे आहेत. ते ग्रहण संपेपर्यंत.
आजारी वृद्ध बालक गर्भवती स्त्रिया आठ तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून या ग्रहणाचे वेध पाळू शकतात. आता आधी बघूयात कोणत्या राशीसाठी हे ग्रहण शुभ आहे आणि कोणत्या राशीसाठी अशुभ. मिथुन कर्क वृश्चिक आणि कुंभ राशीसाठी हे ग्रहण शुभ असेल. सिंह स्थळ धनु आणि मीन राशीसाठी हे ग्रहण मिश्र फल देणार असेल.
तर वृषभ मेष कन्या आणि मकर राशीसाठी अनिष्ट फळ घेऊन येणार असेल. आणि ज्यांना अनिष्ट फल आहे त्यांनी आणि गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये. पण ग्रहणामध्ये हा उपाय मात्र तुम्ही कोणीही करू शकता. या उपायाने नक्कीच तुमच्यावरची सगळीच संकटे दूर होतील. चंद्रग्रहणाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची ही एक चांगली संधी आहे.
हे काही विशेष आणि खास उपाय तुम्ही केले तर धनाशी संबंधित समस्या दूर होतात. मग तो उपाय असा आहे की चंद्रग्रहणापूर्वी आंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करा. नंतर उत्तरेकडे तोंड करून बसा. एका ताटामध्ये कुंकू आणि स्वस्तिक आणि ओम बनवून ताट पाटावर ठेवा. त्यानंतर महालक्ष्मी मंत्र स्थापित करा.
त्यानंतर एका दुसऱ्या ताटात संकट ठेवा. आणि त्या शंका मध्ये कुंकवाने रंगवलेले मुठभर तांदूळ ठेवा. तुपाचा दिवा लावा. अणि स्पटिकाच्या माळेने एक मंत्र जप करा. तो मंत्र याप्रमाणे आहे. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रधायिनी मंत्र मूर्ती सदादेवी महालक्ष्मी नमोस्तुते. या मंत्राचा जप तुम्हाला स्फटिकाच्या माळेवर करायचा आहे. १०८ वेळा कमीत कमी करायचा आहे.
जास्त केला तरी काही हरकत नाही. चंद्रग्रहण संपल्यानंतर ही संपूर्ण जी सामग्री आहे. जी आपण आता गोळा केली होती. ती नदी किंवा तलावामध्ये वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या. या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्याला धनप्राप्ती होते. त्याचबरोबर धनाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत. त्या दूर होतात. असं म्हटलं जात.
त्याचबरोबर तुम्ही आणखीनही एक उपाय करू शकता. तुम्ही महालक्ष्मी अष्टक सुद्धा ग्रहण काळामध्ये म्हणू शकता. तुमचा जो इष्ट देवतेचा मंत्र असेल तो मंत्र सुद्धा ग्रहण काळामध्ये नक्की जपा. कारण ग्रहण काळामध्ये जे मंत्र किंवा जे स्तोत्र आपण म्हणतो त्यांना एक ऊर्जा मिळते.
ती उजळले जातात. त्यांच्यामध्ये एक प्रकारची शक्ती येते. आणि जेव्हा जेव्हा आपण या मंत्रांचा या स्तोत्रां चा उच्चार करतो तेव्हा तेव्हा आपली मनोकामना पूर्ण होते. अस म्हटल जाते. नोव्हेंबर महिन्यामध्ये आठ तारखेला होणाऱ्या चंद्रग्रहणामध्ये तुम्ही हा उपाय नक्की करून बघा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.